बोगस क्लीन अप मार्शल? दंडाची रक्कम देण्यापूर्वी खातरजमा करून घ्या

  60

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विनामास्क फिरणा-या व्यक्ती तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणा-या व्यक्तिंवर कारवाईसाठी नेमलेल्या क्लीन अप मार्शल यांना दंडाची रक्कम देण्यापूर्वी, क्लीन अप मार्शलनी गणवेष परिधान केलेला आहे, त्यांच्या गणवेषावर संबंधित विभागाचे नाव व अनुक्रमांक नमूद केला आहे, याची खातरजमा केल्यानंतरच नागरिकांनी दंडाची रक्कम भरावी व पावती देखील घ्यावी. याअनुषंगाने कोणत्याही तक्रारीसाठी टोल फ्री क्रमांक १८००२२१९१६ यावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


कोविड १९ विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मुखपट्टी अर्थात मास्क लावून वावरणे प्रत्येकास बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास रुपये २०० इतका दंड देखील आकारला जातो. मुंबई महानगरामध्ये कोविड १९ विषाणू संसर्ग पुन्हा एकदा वाढीस लागला आहे. त्यामुळे हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी विनामुखपट्टी अर्थात विनामास्क फिरणा-या नागरिकांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.


जे नागरिक मास्क परिधान करणार नाहीत, अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी, प्रत्येक प्रशासकीय विभागासाठी एक याप्रमाणे खासगी सुरक्षारक्षक क्लीन अप मार्शल संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांचे क्लीनअप मार्शल गणवेष परिधान केलेले असतात. या गणवेषावर संबंधित विभागाचे नाव व त्यांचा अनुक्रमांक लिहिलेला असतो. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा मास्क परिधान न करणे या प्रत्येक उल्लंघनाकरिता रुपये २०० याप्रमाणे दंडात्मक कारवाई केली जाते. त्या दंडाची पावती देखील क्लीनअप मार्शल कडून संबंधित नागरिकास दिली जाते.


सबब, मुंबई महानगरातील नागरिकांना महापालिकेतर्फे आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारची कारवाई होत असताना, क्लीनअप मार्शल यांनी गणवेष परिधान केलेला असणे, त्यांच्या गणवेषावर संबंधित विभागाचे नाव व अनुक्रमांक असणे, तसेच दंडाची पावती देणे या सर्व बाबी आवश्यक आहेत.


संबंधित नागरिकांनी दंडाची रक्कम क्लीनअप मार्शलकडे देण्यापूर्वी या सर्व बाबींची खातरजमा करावी. दंड भरल्यानंतर त्याची पावती आवर्जून घ्यावी. तसेच आवश्यकता भासल्यास टोल फ्री क्रमांक १८००२२१९१६ यावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.