कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत दक्षता घ्या

  33

नाशिक: सध्या देशात, राज्यासह नाशिक शहरातही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहेत. लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिकही व्यापक प्रमाणात कोरोनाबाधीत होत आहेत. त्यामुळे स्वत:ला कोरोनापासून वाचविण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधात्मक उपाय करून दक्षता घ्यावी, असे आवाहन नाशिकचे महापौर सतिश कुलकर्णी यांनी जनतेला केले आहे.



तिसऱ्या लाटेच्या तीव्रतेबाबत आढावा घेतला असता दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. दि. १ जानेवारी रोजी शहरात ७१ कोरोना रुग्ण होते. नंतर दि. २ रोजी ८८, दि. ३ रोजी १५१, दि. ४ रोजी २७६ अशा चढ्या क्रमाने नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून बुधवारी ५ जानेवारीला तब्बल ४१३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. रुग्ण संख्येत मोठी वाढ होत असल्याने वेळीच सावध होऊन संभाव्य तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी नाशिककर जनतेने योग्य ती दक्षता घेऊन, नियमांचे पालन करून सहकार्य करणे गरजेचे आहे. त्यासाठी नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असेही महापौर कुलकर्णी यांनी म्हटले आहे.



आजमितीस एकूण ५०० अॅक्टीव रुग्णांपैकी ६९ रुग्ण मनपा रुग्णालयात उपचार घेत आहेत. यासर्व परिस्थितीचा विचार करता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सुरक्षितता मिळविण्यासाठी खबरदारीचे उपाय अथवा प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत शहरात १०० टक्के लसीकरण होणे हाच एक पर्याय आहे. यामध्ये ज्या नागरिकांनी अद्याप लसीचा एकही डोस घेतलेला नाही, अशा नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. त्याचबरेाबर टेस्टींगची संख्या वाढविणे गरजेचे आहे. त्याच प्रमाणे शाळा बंद ठेवणे हिताचे होईल.


सार्वजनिक ठिकाणी, सभा, समारंभ, लग्न समारंभ व गर्दीच्या ठिकाणी नागरिक नियम पाळत नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे सांगत मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांचे लसीकरण मोहिमेअंतर्गत आधार कार्ड किंवा आय कार्डवर देखील लसीकरण करण्यात यावे, असे निर्देश दिले आले. शहरातील सर्वच्या सर्व ७० कोवीड सेंटर पुन्हा येत्या ३ ते ४ दिवसांत वेगाने कार्यान्वित करण्यात येतील.


त्याचप्रमाणे ज्या नागरिकांनी लस घेतलेली असेल तरी त्या नागरिकांनी कोरोनास प्रतिबंध म्हणून जलनेती, प्राणायाम, होमिओपॅथी, आयुर्वेदिक उपाय करणे गरजेचे असल्याचेही महापौर म्हणाले. शहर पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेने न्यायाचे की कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहायचे याचा विचार सर्वच नागरिकांनी करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या