शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची परवानगी द्या

मुंबई : राज्यासह मुंबईत कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्या वाढत असल्याने शाळा बंद करण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला दिला आहे. त्यानुसार मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत, तर विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या परवानगीप्रमाणे दहावीच्या शाळा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पूर्ण हजेरीवर परिणाम झाला असून संख्येने कमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना शाळेत वेळेत पोहचावे लागते. त्यामुळे त्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची अनुमती द्यावी अशी मागणी टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटने केली आहे.



सध्या अन्य वर्ग बंद असल्याने शिक्षकांना ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने शिकवण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. अशा वेळी प्रशासनाने शाळेत शिक्षकांची उपस्थिती संदर्भात निर्णय न घेतल्याने शिक्षकांत संभ्रम आहे. लांब प्रवास करून येणाऱ्या शिक्षकांचा प्रवासात वेळही वाया जातो. शिक्षकांच्या आरोग्याचा विचार करून प्रशासनाने शाळेत विद्यार्थी येत नसल्याने शिक्षकांना संस्थेत न बोलवता वर्क फ्रॉम होम करण्याचा व संस्थेत एकाच वेळी उपस्थिती क्षमतेचा सहानुभूतीने निर्णय जाहीर करण्यात यावा, अशी मागणी टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी केली आहे.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,