Corona Updates : देशात २४ तासांत कोरोनाचे ९०,९२८ तर ओमायक्रॉनचे २६३० नवीन रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९०, ९२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ३२५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही संख्या गेल्या ७ महिन्यातील सर्वाधिक आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये ९१,८४९ रुग्ण आढळून आले होते. तर गेल्या २४ तासांत १९,१५२ जण बरे झाले आहेत.


https://twitter.com/ANI/status/1478937359026561027?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1478937359026561027%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.dainikprabhat.com%2Fcorona-in-india-e0a497e0a587e0a4b2e0a58de0a4afe0a4be-24-e0a4a4e0a4bee0a4b8e0a4bee0a4a4-90-e0a4b9e0a49ce0a4bee0a4b0-928-e0a495e0a4b0e0a58b%2F

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख ८५ हजार ४०१ वर पोहचली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ४ लाख ८२ हजार ८७६ झाली आहे. याशिवाय काल १९ हजार २०६ लोक कोरोनातून बरे झाले. तर आतापर्यंत ३ कोटी ४३ लाख ४११ हजार ९ लोक संसर्गमुक्त झाले आहेत. मात्र देशातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर हा ६.४३ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.



ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २६३० वर पोहचली


देशात ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २६३० इतकी झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे एकूण ७९७ रुग्णांची नोंद झाली. त्यातील ३३० जण बरे झाले आहेत. तर दिल्लीत ओमायक्रॉनचे ४६५ रुग्ण आढळले. त्यापैकी ५७ जण बरे झाले आहेत. देशातील ओमायक्रॉनच्या २६३० रुग्णांपैकी ९९५ जण बरे झाले आहेत.


Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी