Corona Updates : देशात २४ तासांत कोरोनाचे ९०,९२८ तर ओमायक्रॉनचे २६३० नवीन रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९०, ९२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ३२५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही संख्या गेल्या ७ महिन्यातील सर्वाधिक आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये ९१,८४९ रुग्ण आढळून आले होते. तर गेल्या २४ तासांत १९,१५२ जण बरे झाले आहेत.


https://twitter.com/ANI/status/1478937359026561027?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1478937359026561027%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.dainikprabhat.com%2Fcorona-in-india-e0a497e0a587e0a4b2e0a58de0a4afe0a4be-24-e0a4a4e0a4bee0a4b8e0a4bee0a4a4-90-e0a4b9e0a49ce0a4bee0a4b0-928-e0a495e0a4b0e0a58b%2F

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख ८५ हजार ४०१ वर पोहचली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ४ लाख ८२ हजार ८७६ झाली आहे. याशिवाय काल १९ हजार २०६ लोक कोरोनातून बरे झाले. तर आतापर्यंत ३ कोटी ४३ लाख ४११ हजार ९ लोक संसर्गमुक्त झाले आहेत. मात्र देशातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर हा ६.४३ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.



ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २६३० वर पोहचली


देशात ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २६३० इतकी झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे एकूण ७९७ रुग्णांची नोंद झाली. त्यातील ३३० जण बरे झाले आहेत. तर दिल्लीत ओमायक्रॉनचे ४६५ रुग्ण आढळले. त्यापैकी ५७ जण बरे झाले आहेत. देशातील ओमायक्रॉनच्या २६३० रुग्णांपैकी ९९५ जण बरे झाले आहेत.


Comments
Add Comment

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावरुन एकाच फॉर्च्युनरमधून मोदी आणि पुतिन रवाना

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन गुरुवारी संध्याकाळी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले. नवी

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट