Corona Updates : देशात २४ तासांत कोरोनाचे ९०,९२८ तर ओमायक्रॉनचे २६३० नवीन रुग्ण

नवी दिल्ली : देशात कोरोना आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९०, ९२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ३२५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही संख्या गेल्या ७ महिन्यातील सर्वाधिक आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये ९१,८४९ रुग्ण आढळून आले होते. तर गेल्या २४ तासांत १९,१५२ जण बरे झाले आहेत.


https://twitter.com/ANI/status/1478937359026561027?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1478937359026561027%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.dainikprabhat.com%2Fcorona-in-india-e0a497e0a587e0a4b2e0a58de0a4afe0a4be-24-e0a4a4e0a4bee0a4b8e0a4bee0a4a4-90-e0a4b9e0a49ce0a4bee0a4b0-928-e0a495e0a4b0e0a58b%2F

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या २ लाख ८५ हजार ४०१ वर पोहचली आहे. त्याचबरोबर या साथीमुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ४ लाख ८२ हजार ८७६ झाली आहे. याशिवाय काल १९ हजार २०६ लोक कोरोनातून बरे झाले. तर आतापर्यंत ३ कोटी ४३ लाख ४११ हजार ९ लोक संसर्गमुक्त झाले आहेत. मात्र देशातील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी दर हा ६.४३ टक्क्यांवर गेला आहे. यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.



ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २६३० वर पोहचली


देशात ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या २६३० इतकी झाली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीत ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे एकूण ७९७ रुग्णांची नोंद झाली. त्यातील ३३० जण बरे झाले आहेत. तर दिल्लीत ओमायक्रॉनचे ४६५ रुग्ण आढळले. त्यापैकी ५७ जण बरे झाले आहेत. देशातील ओमायक्रॉनच्या २६३० रुग्णांपैकी ९९५ जण बरे झाले आहेत.


Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला