अंबरनाथ-पालेगाव परिसरातील पाणीपुरवठा लवकरच सुरू होणार

Share

सोनू शिंदे

उल्हासनगर : अंबरनाथ येथील पालेगाव, जुना अंबरनाथ परिसरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुल बांधण्यात आली आहेत. मात्र पिण्याच्या पाण्याची टंचाई अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. दिवंगत राकेश पाटील यांनी सतत ३ वर्षे पाणीटंचाईच्या विरोधात विविध प्रकारची आंदोलने केली होती. अखेर पाणीटंचाईचा प्रश्न एका महिन्यात मार्गी लावण्याचे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दिले आहे.
कर्जत महामार्गालगत असलेल्या पालेगाव, जुना अंबरनाथ गाव परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. या ठिकाणी सुमारे हजारो कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. संकुलात चांगले रस्ते, पथदिवे आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज निवासी क्षेत्र आहे.

हजारो नागरिकांनी सदनिका खरेदी केल्या आहेत. मात्र स्थानिक पाणीपुरवठा यंत्रणेमार्फत रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात नाही. अशा स्थितीत टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही. याचा परिणाम बांधकाम व्यावसायिकांवरही होत आहे. त्यामुळे या भागात पाण्याची टाकी बांधण्यासाठी स्थानिक बिल्डरांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला जमीन मोफत दिली होती. असे असतानाही पाण्याच्या टाकीला पाइपलाइन जोडून परिसरातील नागरिकांसाठी पाण्याची समस्या सोडविण्याचे काम झालेले नाही.

दरम्यान तातडीने पाइपलाइन जोडून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी तीन वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते व मनसे शहर उपाध्यक्ष दिवंगत राकेश पाटील यांनी निवेदने, पत्रव्यवहार, आंदोलने करून पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्यात मोठा वाटा उचलला होता. स्थानिक राहिवाशांच्या मदतीने रस्त्यावर उतरून आंदोलने, आमरण उपोषणे करून या प्रश्नाला वाचा फोडली होती.
दरम्यान आरसी एमआयडीसी पाइपलाइनद्वारे पाणी टाकीपर्यंत नेले जाईल. त्यानंतर पाणी वाटप केले जाईल. तीन वर्षांपासून पाइपलाइन टाकण्यात आली आहे. एकदा त्याची पाहणी केली जाईल तसेच आवश्यक तेथे दुरुस्ती व जोडणी करून महिनाभरात पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बासनगर यांनी सांगितले.

Tags: sonu shinde

Recent Posts

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

10 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

15 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

45 minutes ago

कामगार कायद्यांमध्ये सुधारणा; महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार

मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…

1 hour ago

Rafrigerator Care: फ्रिज भिंतीपासून किती अंतरावर असावा?

Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…

1 hour ago

Gond Katira: दगडासारखी दिसणारी ही गोष्ट उन्हाळ्यात आहे अतिशय फायदेशीर

मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…

2 hours ago