अंबरनाथ-पालेगाव परिसरातील पाणीपुरवठा लवकरच सुरू होणार

  79

सोनू शिंदे


उल्हासनगर : अंबरनाथ येथील पालेगाव, जुना अंबरनाथ परिसरात मोठ्या प्रमाणात गृहसंकुल बांधण्यात आली आहेत. मात्र पिण्याच्या पाण्याची टंचाई अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. दिवंगत राकेश पाटील यांनी सतत ३ वर्षे पाणीटंचाईच्या विरोधात विविध प्रकारची आंदोलने केली होती. अखेर पाणीटंचाईचा प्रश्न एका महिन्यात मार्गी लावण्याचे आश्वासन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दिले आहे.
कर्जत महामार्गालगत असलेल्या पालेगाव, जुना अंबरनाथ गाव परिसरात गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. या ठिकाणी सुमारे हजारो कुटुंबांचे स्थलांतर झाले आहे. संकुलात चांगले रस्ते, पथदिवे आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज निवासी क्षेत्र आहे.

हजारो नागरिकांनी सदनिका खरेदी केल्या आहेत. मात्र स्थानिक पाणीपुरवठा यंत्रणेमार्फत रहिवाशांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात नाही. अशा स्थितीत टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही. याचा परिणाम बांधकाम व्यावसायिकांवरही होत आहे. त्यामुळे या भागात पाण्याची टाकी बांधण्यासाठी स्थानिक बिल्डरांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला जमीन मोफत दिली होती. असे असतानाही पाण्याच्या टाकीला पाइपलाइन जोडून परिसरातील नागरिकांसाठी पाण्याची समस्या सोडविण्याचे काम झालेले नाही.

दरम्यान तातडीने पाइपलाइन जोडून नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी तीन वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते व मनसे शहर उपाध्यक्ष दिवंगत राकेश पाटील यांनी निवेदने, पत्रव्यवहार, आंदोलने करून पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करण्यात मोठा वाटा उचलला होता. स्थानिक राहिवाशांच्या मदतीने रस्त्यावर उतरून आंदोलने, आमरण उपोषणे करून या प्रश्नाला वाचा फोडली होती.
दरम्यान आरसी एमआयडीसी पाइपलाइनद्वारे पाणी टाकीपर्यंत नेले जाईल. त्यानंतर पाणी वाटप केले जाईल. तीन वर्षांपासून पाइपलाइन टाकण्यात आली आहे. एकदा त्याची पाहणी केली जाईल तसेच आवश्यक तेथे दुरुस्ती व जोडणी करून महिनाभरात पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बासनगर यांनी सांगितले.
Comments
Add Comment

दादरचा ऐतिहासिक कबूतरखाना बंद: मुंबईची एक ओळख काळाच्या पडद्याआड

मुंबई: दादर पश्चिमेचा कबुतरखाना आता कायमचा बंद होणार आहे. एकेकाळी दादरकरांसाठी पत्ता सांगताना कबुतरखाना ही एक

सर्व प्रतिज्ञापत्रांसाठी मुद्रांक शुल्क माफ

महसूलमंत्री बावनकुळे यांची घोषणा मुंबई : सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे पाचशे रुपयांचे

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या सार्वजनिक, वैयक्तिक समस्यांवर थेट सुनावणी

जनतेच्या तक्रारींचे त्वरित निवारण  सिंधुदुर्गनगरी : शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या अनेक

आपल्या देशाचे नाव उंचावण्याची भावी अधिकाऱ्यांची जबाबदारी

खासदार नारायण राणे यांचे यूपीएससी गुणवंतांना मार्गदर्शन मुंबई : येत्या काळात भारत हा चौथ्या अर्थव्यवस्थेवरून

शुक्रवारच्या कारवाईनंतर दादर कबुतर खान्यावर खाद्य देणे सुरूच !

खाद्य विकणाऱ्यांसह दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतर खान्यांवर

सार्वजनिक वाहनांमध्ये बसवणार पॅनिक बटण, मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): सार्वजनिक प्रवासी वाहनांमधील महिलांच्या सुरक्षेचा मु्द्दा ऐरणीवर आला होता. सार्वजनिक