पुलवामा चकमकीत ३ दहशतवादी ठार

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आज, बुधवारी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक पाकिस्तानी नागरिक आहे. या दहशतवाद्यांकडून दोन एम-४ कार्बाइन आणि एक एके सीरीज रायफलसह गुन्हेगारी साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.


या वर्षाच्या पाचव्या दिवसांतील ही चौथी चकमक आहे. अलीकडेच दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये सैन्याने ९ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.


यासंदर्भात जम्मू-काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितले की, दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल गुप्तचर माहितीच्या आधारे, पोलीस आणि सुरक्षा दलाच्या पथकाने बुधवारी सकाळी जिल्ह्यातील चंदगाम गावात शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनीही गोळीबार केला. दोन्ही बाजूंच्या चकमकीत एका पाकिस्तानीसह जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी मारले गेले.


जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा हे मोठे यश असल्याचे विजय कुमार यांनी सांगितले. दक्षिण काश्मीरमध्ये सोमवारपासूनची ही दुसरी चकमक आहे. कुलगाम जिल्ह्यात मंगळवारी झालेल्या चकमकीत दोन स्थानिक दहशतवादी ठार झाले. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये कारवाई करण्याचे धाडस केले होते. याला सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे सुरक्षा दलाच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी मारला गेला होता.

Comments
Add Comment

पंतप्रधान येत्या २० आणि २१ डिसेंबरला आसाम दौऱ्यावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २० आणि २१  डिसेंबरला आसामला भेट देणार आहेत. दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी ३

SIR तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा पश्चिम बंगाल दौरा, ३२०० कोटींचे प्रकल्प सुरू

मुंबई : सध्या पश्चिम बंगालमध्ये SIR मुद्द्यावरून तणावपूर्ण वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताला मोठ्या लढाईत गुंतवून ठेवण्याचा डाव ?

कोलकाता : बांगलादेशमध्ये एकीकडे जमिनीवर भारतविरोधी आंदोलनांना धार येत असतानाच, दुसरीकडे समुद्रातही तणाव

ओला-उबरला टक्कर; १ जानेवारीपासून भारत टॅक्सी ॲप सुरू होणार

मुंबई : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे ती म्हणजे, ओला आणि उबरसारख्या खासगी टॅक्सी सेवांना पर्याय ठरणारे भारत

Indian Railways : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! वेटिंग आणि RAC तिकिटांचे नियम बदलले, आता रात्री झोपण्यापूर्वीच...रेल्वेची मोठी अपडेट वाचा

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेकदा रेल्वे

महाराष्ट्रभूषण राम सुतार यांचे निधन; दिल्लीत अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी‘चे शिल्पकार राम वनजी सुतार यांचे