'बुली बाई'ची मास्टर माईंड १८ वर्षांची तरूणी

  75

मुंबई : काही दिवसांपूर्वी महिलांची बदनामी करणाऱ्या आणि त्यांचा लिलाव करणा-या अॅपचा पर्दाफाश झाला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यासंदर्भात आज मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. त्यावेळी त्यांनी आरोपींची मोडस ऑपरेंडीही स्पष्ट केली.


मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे बोलताना म्हणाले की, "बुली बाई अॅप प्रकरणाचा तपास गेल्या तीन दिवसांपासून सुरु आहे. अजून बराच मोठा तपास करायचा बाकी आहे. आरोपींना कुठलाही फायदा मिळू नये यासाठी काही गोष्टी गोपनिय ठेवण्यात आल्या आहेत. इंटरनेटवर वेबसाठी असलेलं बुली बाई नावाचं अॅप तयार करण्यात आलं होतं. विशिष्ठ समाजातील महिलांचे फोटो या अॅपवर अपलोड करण्यात आले होते. तसेच त्याबाबत आक्षेपार्ह्य संदेश लिहिण्यात आला होता. 31 डिसेंबरला हे अॅप लॉन्च करण्यात आलं होतं. याप्रकरणी 2 जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला, अशी माहिती पोलीस आयुक्त नगराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


"तक्रार प्राप्त झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं वेगानं सूत्र हलवली. बुली बाई नावानं ट्विटर हॅन्डलही करण्यात आलं होतं. ही वेबसाईट जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं ही टीम काम करत होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकानं याच्या फॉलोअर्सची माहिती काढली. ही वेबसाईट फक्त पाचच जण फॉलो करत होते. आतापर्यंत या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी एक विशाल झा, दुसरी आरोपी श्वेता सिंह, तर तिसरी आरोपी उत्तराखंड येथील आहे."




काय आहे प्रकरण? 



पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बुली बाई' अॅप्लिकेशनवर जवळपास 100 प्रसिद्ध मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड करण्यात आले होते. ज्यामध्ये काही पत्रकार महिला आणि त्यांचे फोटोही अपलोड करण्यात आले होते. तसेच त्यांची बोलीही लावली जात होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेलनं ट्विटरला लिहिलं होतं. कारण 'बुली बाई'शी संबंधित तीन ट्विटर हँडलची माहिती पोलिसांना मिळाली. या अॅप्लिकेशनची तक्रार आल्यानंतरच मुंबई पोलिसांनी 'बुली बाई' अॅप्लिकेशन तयार करणाऱ्या डोमेन गुगलला पत्र लिहून हे अॅप्लिकेशन बंद करण्याचे निर्देश दिले होते.

Comments
Add Comment

परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारने अखेर सोडल मौन

मुंबई : अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या तिकडीने 'हेरा फेरी' सिनेमातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं.आता

रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता रत्नागिरी, पुणे घाट, सातारा घाट,

सागरी सुरक्षेला शासनाचे नेहमीच प्राधान्य – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

भाऊचा धक्का येथे नवीन गस्ती नौकेची मंत्री राणे यांनी केली पहाणी मुंबई : सागरी सुरक्षा हा एक महत्त्वाचा विषय असून

महिलांच्या नावे बनावट आयडी बनवणारा शुभम सिंग, पोलिसांच्या जाळ्यात; २५ वर्षीय सुरक्षा रक्षकाकडून ३०० महिलांची फसवणूक

मुंबई : महिला आणि मुलींच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट आयडी तयार करून अश्लील मेसेज पसरवणाऱ्या शुभम कुमार

स्थानिकांना दिलासा ! संरक्षण भिंत पाडणार नाही; राज्य सरकारची हमी...

मुंबई : गेट वे ऑफ इंडिया (Gateway of India) आणि रेडिओ क्लबदरम्यान प्रस्ताविक जेट्टीसाठी समुद्रलगत असणारी सरंक्षण भिंत ३०

धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे निर्देश मुंबई (प्रतिनिधी) : पावसाळ्यामध्ये पर्यटक ज्या ठिकाणी अधिक संख्येने येतात