रायगडमध्ये तीन शाळांतील २० विद्यार्थांना कोरोना

रायगड : ज्याची भीती होती तेच झाले. रायगड जिल्ह्यातील तीन शाळेतील २० विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, तर दोन शिक्षक हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच जिल्हाधिकारी यांनी तातडीने जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या सर्व शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.



विद्यार्थ्यांची प्रकृतिस्थिर आहे. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत. तर अन्य विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत असल्याने आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाड तालुक्यातील विन्हेरे येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील १८ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षक हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर वरंध येथील छत्रपती शिवाजी विद्यालयातील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थाला कोरोना झाल्याचे समोर आले आहे.



कोएसो महाड इंग्लिश मिडीयम स्कूलमधील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. २० विद्यार्थी आणि दोन शिक्षक असे एकूण २२ जणांना कोराना झाला आहे.त्यामुळे पालकांच्या उरात चांगलीच धडकी भरली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमधील शाळा बंद करण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला असताना रायगड जिल्ह्यामध्ये निर्णय घेण्यास विलंब का केला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comments
Add Comment

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक

Sanjay Shirsat : "तुमचा डबा रुळावरून घसरलाय, आता काठावर बसा"; मंत्री शिरसाटांचा उद्धव ठाकरेंना टोला

छत्रपती संभाजीनगर : "उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गटाचा जीव केवळ मुंबईत अडकलेला आहे. नगरपालिका निवडणुकीत