निधी नसल्याने कोकण रेल्वेचे हात वर

  122

महाड: कोकण रेल्वेच्या दासगाव येथील पूल आणि भरावाची संयुक्त पाहणी आज (बुधवार) करण्यात आली. महाड पूर निवारण समितीने या पूल आणि भरावासंदर्भात मांडलेली भूमिका कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी यावेळेस तत्वतः मान्य केली. महिनाभरात या पाहणीचा अंतिम अहवाल आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे कोकण रेल्वेकडून यावेळेस सांगण्यात आले. कोकण रेल्वेचा हा अहवाल भराव काढून टाकण्यास अनुकूल असला तर महाडकरांना दिलासा मिळणार आहे.

दि. २१ व २२ जुलै २०२१ रोजी आलेल्या महापुराने यापूर्वीच्या पुराची पातळी ओलांडल्याने ओढवलेल्या महाप्रलयास कोकण रेल्वेने दासगाव पुलाजवळ गोठ्यापर्यंत जो भराव केला आहे, तो प्रमुख कारणीभूत असल्याचा निष्कर्ष २२ डिसेंबर रोजी झालेल्या रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण रेल्वे, कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, खारभूमी लँड, महाड पूर निवारण समितीच्या बैठकीत काढण्यात आला होता. या संदर्भात कोकण रेल्वेने नियुक्त केलेल्या आयआयटी मुंबई या संस्थेचा अहवाल देण्यापूर्वी या समितीच्या तज्ज्ञांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करून नंतर निष्कर्ष काढावा व अहवाल सादर करावा असे ठरवण्यात आले होते.

त्यानुसार आज आयआयटी मुंबईचे प्रमुख गुप्ता, कोकण रेल्वेचे अधिकारी कपिल पाटील, नागदत्त, महाडच्या प्रांताधिकारी पुदलवाड, महाडचे तहसीलदार काशिद, रायगड पाटबंधारे विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता धाकतोडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सदाफुले, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे भोये, पाटबंधारे विभागाचे प्रकाश पोळ महाड पूर निवारण समितीचे संजय मेहता, नितीन पावले आदी उपस्थित होते.

पाहणीनंतर, प्रशासकीय अधिकारी आणि पूरनिवारण समितीच्या सदस्यांनी, महाडच्या महापुराला हा पूल आणि भराव कसा कारणीभूत ठरला आहे, ते कोकण रेल्वेचे अधिकारी आणि आयआयटीच्या तज्ज्ञांना पटवून दिले. त्यावर साधकबाधक चर्चा करण्यात आली. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी हा पूल आणि भराव पुराला कारणीभूत ठरत असेल तर काय उपाययोजना करता येतील याची माहिती देत, ते करण्याची तयारी दर्शवली.

या पाहणी दौऱ्याबाबत माहिती देताना महाडच्या प्रांताधिकारी पुदलवाड यांनी सांगितले की, दि. २२ डिसेंबर रोजी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेतील निर्णयानुसार आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ कोकण रेल्वेचे अधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी कोकण रेल्वेचा दासगाव पूल ते गोठेपर्यंत केलेल्या भरावाची पाहणी केली.

कोकण रेल्वेचा अहवाल अद्याप तयार झालेला नाही. हा अहवाल तयार करण्यापूर्वी पूरनिवारण समिती आणि प्रशासनाने तयार केलेला अहवाल कोकण रेल्वेला देण्यात येईल. कोकण रेल्वेच्या अहवालात आयआयटीने त्यातील मुद्यांचाही समावेश करावा, अशी सूचना प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी केली. ती कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी मान्य केली आहे. महिनाभरात अंतिम अहवाल तयार करण्यात येईल, असे कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले असल्याने पुदलवाड म्हणाल्या.
Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून

जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील