नवी मुंबईत थंड वातावरणात कोरोनाची धास्ती

नवी मुंबई (प्रतिनिधी) :नवी मुंबईत मागील तीन दिवसांत दोन हजारच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच थंडीचे दिवस सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात सर्दी, खोकला व ताप आल्याने कोरोनाच्या संसर्गाची भीती रुग्णांमध्ये निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

ताप, सर्दी व खोकला झालेल्या रुग्णांची अँटीजन, आरटीपीसीआर तपासणी केली, तर काहींची चाचणी सकारात्मक येत आहे, तर काही रुगांना जरी सर्दी, ताप व खोकल्यासारखी व्याधी असली तरी त्यांची कोरोनाच्या संसर्गाची तपासणी ही नकारात्मक येत आहे. पण कोरोनाचे सावट नवी मुंबईवर असल्याने नागरिकांच्या मनात भीती दिसून येत आहे.

सोमवारपासून बुधवारपर्यंत जवळ-जवळ दोन हजार कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. मनपाच्या रुग्णालयात डॉक्टरांना तपासणीच्या आधी चाचणी तर करावीच लागते. त्याशिवाय रुग्णाला केसपेपर मिळत नाही, हे जरी खरे असले तरी थंडीच्या कालावधीत उपलब्ध होणारे आजार हे सर्वसामान्य आहेत. नवी मुंबईत खासगी रुग्णालयांत देखील रुग्णांची वाढ होताना दिसून येत आहे. अँटीजन चाचणीचा अहवाल तत्काळ येत असल्याने काही रुग्णांच्या तोंडावर हसू, तर काही रुग्ण निराश दिसत आहेत.
Comments
Add Comment

मुंबईतील काही परिसर फेरीवालामुक्त ठेवणारच; महापालिका आयुक्तांनी दिले तीव्र कारवाईचे निर्देश

मुंबई: मुंबई महानगराची वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि पदपथांवरील अतिक्रमण यामुळे पादचाऱ्यांना सुरक्षितपणे

मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी संध्‍या विपुल दोशी

मुंबई: मुंबई महानगरपालिका सुधार समिती अध्यक्षपदी संध्या विपुल दोशी (सक्रे) यांची यांची सोमवारी २३ फेब्रुवारी

तीन वर्षांनंतर प्रथमच स्वीकारणार स्थायी समिती अध्यक्ष स्वीकारणार महापालिका अर्थसंकल्प

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७ चा अर्थसंकल्प येत्या बुधवारी मांडला जाणार असून तब्बल तीन वर्षांनतर

महापालिकेत भाजपकडून छेडा,सिंह,कर्पे, दळवी, तर शिवसेनेकडून ब्रीद, सुर्वे यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार असून या दहा जागांसाठी

रोमानिया – मिलिसाऊटी शहराच्या महापौरांनी घेतली मुंबईच्या महापौरांची सदिच्छा भेट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रोमानिया – मिलिसाऊटी शहराच्या महापौर वांगले कॅमेरे यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती

'गाडगेबाबांचा जीवन संदेश आचरणात आणण्याची गरज'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गाडगे महाराजांनी आयुष्यभर सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा, गोरगरीब रुग्णांची सेवा,