नवी मुंबईत थंड वातावरणात कोरोनाची धास्ती

  75

नवी मुंबई (प्रतिनिधी) :नवी मुंबईत मागील तीन दिवसांत दोन हजारच्या आसपास कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यातच थंडीचे दिवस सुरू असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात सर्दी, खोकला व ताप आल्याने कोरोनाच्या संसर्गाची भीती रुग्णांमध्ये निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

ताप, सर्दी व खोकला झालेल्या रुग्णांची अँटीजन, आरटीपीसीआर तपासणी केली, तर काहींची चाचणी सकारात्मक येत आहे, तर काही रुगांना जरी सर्दी, ताप व खोकल्यासारखी व्याधी असली तरी त्यांची कोरोनाच्या संसर्गाची तपासणी ही नकारात्मक येत आहे. पण कोरोनाचे सावट नवी मुंबईवर असल्याने नागरिकांच्या मनात भीती दिसून येत आहे.

सोमवारपासून बुधवारपर्यंत जवळ-जवळ दोन हजार कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. मनपाच्या रुग्णालयात डॉक्टरांना तपासणीच्या आधी चाचणी तर करावीच लागते. त्याशिवाय रुग्णाला केसपेपर मिळत नाही, हे जरी खरे असले तरी थंडीच्या कालावधीत उपलब्ध होणारे आजार हे सर्वसामान्य आहेत. नवी मुंबईत खासगी रुग्णालयांत देखील रुग्णांची वाढ होताना दिसून येत आहे. अँटीजन चाचणीचा अहवाल तत्काळ येत असल्याने काही रुग्णांच्या तोंडावर हसू, तर काही रुग्ण निराश दिसत आहेत.
Comments
Add Comment

डॉक्टरांपेक्षा एक रुपया अधिक पगार पाहिजे; आत्मसन्मानासाठी मुंबईचे 'सफाई कर्मचारी' सरसावले!

मुंबई : मुंबईसारख्या महानगरात स्वच्छतेची जबाबदारी खांद्यावर घेतलेले मनपाचे सफाई कर्मचारी आता केवळ झाडू न मारता,

Kabutar Khana : "कबुतरप्रेमींना मोठा धक्का! दाणापाण्यावर बंदी कायम; कोर्टाचा स्पष्ट आदेश"

मुंबई : मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधनाच्या दिवशीही सुविधा मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब

पाणंद रस्त्यांना अडथळा आणाल तर...

मुंबई : राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र आणि ठोस योजना सप्टेंबर महिन्याच्या