मुंबईकरांसाठी दुसरा आठवडा काळजीचा

  224

मुंबई : सध्या मुंबईत रोज कोरोना रुग्णसंख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ होत आहे, त्यामुळे तिसऱ्या लाटेला सुरवात झाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या आणखी वेगाना वाढणार आहे. त्यामुळे दुसरा आठवडा मुंबईकरांसाठी काळजीचा असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ होत असून पुढील चार दिवसांतील वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर लक्ष असून त्यानंतर कठोर निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

मुंबईतील कोरोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही सज्ज झाला आहे दिवसाला २५ हजार रुग्णांसाठी पालिकेने तयारी ठेवली आहे. यात बेड, आरोग्य कर्मचारी-डॉक्टर्स, औषधे अशी सर्व प्रकारची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. २९ डिसेंबरपासून रुग्णसंख्या वाढत असून दररोज होणारी रुग्णवाढ ही सुमारे २० ते ३० टक्क्यांपर्यंत असेल, असा इशारा आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिला आहे.


पुन्हा कर्मचारी भरणार


रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर आरोग्य सेवेवर ताण येऊ नये म्हणून पालिका डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय आदी स्टाफ खासगी कंत्राटी पद्धतीने भरती केला जाणार आहे.


८९ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत


दररोज आढळणाऱ्या रुग्णांपैकी ८९ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसून फक्त ५ टक्के बाधितांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तर रुग्णसंख्या वाढल्यानंतर १० टक्के रुग्ण दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे प्रमाणही जास्त आहे. तर १ ते २ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.

८२ टक्के बेड्स रिक्त


मुंबईत आढळणाऱ्या रुग्णांपैकी ५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे ८२ टक्के बेड्स रिक्त आहेत. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या वाढली तर गरज पडल्यास खाटांची संख्या वाढवली जाणार आहे. जवळपास १ लाख बेड्स तयार ठेवण्यात आले आहेत
Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र