मुंबईकरांसाठी दुसरा आठवडा काळजीचा

  229

मुंबई : सध्या मुंबईत रोज कोरोना रुग्णसंख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ होत आहे, त्यामुळे तिसऱ्या लाटेला सुरवात झाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या आणखी वेगाना वाढणार आहे. त्यामुळे दुसरा आठवडा मुंबईकरांसाठी काळजीचा असणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ होत असून पुढील चार दिवसांतील वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर लक्ष असून त्यानंतर कठोर निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.

मुंबईतील कोरोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही सज्ज झाला आहे दिवसाला २५ हजार रुग्णांसाठी पालिकेने तयारी ठेवली आहे. यात बेड, आरोग्य कर्मचारी-डॉक्टर्स, औषधे अशी सर्व प्रकारची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. २९ डिसेंबरपासून रुग्णसंख्या वाढत असून दररोज होणारी रुग्णवाढ ही सुमारे २० ते ३० टक्क्यांपर्यंत असेल, असा इशारा आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिला आहे.


पुन्हा कर्मचारी भरणार


रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर आरोग्य सेवेवर ताण येऊ नये म्हणून पालिका डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय आदी स्टाफ खासगी कंत्राटी पद्धतीने भरती केला जाणार आहे.


८९ टक्के रुग्णांमध्ये लक्षणे नाहीत


दररोज आढळणाऱ्या रुग्णांपैकी ८९ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसून फक्त ५ टक्के बाधितांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तर रुग्णसंख्या वाढल्यानंतर १० टक्के रुग्ण दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे प्रमाणही जास्त आहे. तर १ ते २ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.

८२ टक्के बेड्स रिक्त


मुंबईत आढळणाऱ्या रुग्णांपैकी ५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे ८२ टक्के बेड्स रिक्त आहेत. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या वाढली तर गरज पडल्यास खाटांची संख्या वाढवली जाणार आहे. जवळपास १ लाख बेड्स तयार ठेवण्यात आले आहेत
Comments
Add Comment

Kabutar Khana : "कबुतरप्रेमींना मोठा धक्का! दाणापाण्यावर बंदी कायम; कोर्टाचा स्पष्ट आदेश"

मुंबई : मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधनाच्या दिवशीही सुविधा मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब

पाणंद रस्त्यांना अडथळा आणाल तर...

मुंबई : राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र आणि ठोस योजना सप्टेंबर महिन्याच्या

पहिलीपासून विद्यार्थ्यांना एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी, त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा,