मुंबई : सध्या मुंबईत रोज कोरोना रुग्णसंख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ होत आहे, त्यामुळे तिसऱ्या लाटेला सुरवात झाली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्णसंख्या आणखी वेगाना वाढणार आहे. त्यामुळे दुसरा आठवडा मुंबईकरांसाठी काळजीचा असणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ होत असून पुढील चार दिवसांतील वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर लक्ष असून त्यानंतर कठोर निर्बंधाबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.
मुंबईतील कोरोनारुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेचा आरोग्य विभागही सज्ज झाला आहे दिवसाला २५ हजार रुग्णांसाठी पालिकेने तयारी ठेवली आहे. यात बेड, आरोग्य कर्मचारी-डॉक्टर्स, औषधे अशी सर्व प्रकारची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. २९ डिसेंबरपासून रुग्णसंख्या वाढत असून दररोज होणारी रुग्णवाढ ही सुमारे २० ते ३० टक्क्यांपर्यंत असेल, असा इशारा आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने दिला आहे.
रुग्णसंख्येत वाढ झाल्यानंतर आरोग्य सेवेवर ताण येऊ नये म्हणून पालिका डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय आदी स्टाफ खासगी कंत्राटी पद्धतीने भरती केला जाणार आहे.
दररोज आढळणाऱ्या रुग्णांपैकी ८९ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसून फक्त ५ टक्के बाधितांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. तर रुग्णसंख्या वाढल्यानंतर १० टक्के रुग्ण दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे प्रमाणही जास्त आहे. तर १ ते २ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे.
मुंबईत आढळणाऱ्या रुग्णांपैकी ५ टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे ८२ टक्के बेड्स रिक्त आहेत. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या वाढली तर गरज पडल्यास खाटांची संख्या वाढवली जाणार आहे. जवळपास १ लाख बेड्स तयार ठेवण्यात आले आहेत
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…