कोरोनाचे २० हजार रुग्ण सापडतील, तेव्हा मुंबईत लॉकडाऊन

  67

१० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास ती इमारत सील करणार


मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांची महत्त्वपूर्ण माहिती


मुंबई : देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामध्ये मुंबई पुन्हा एकदा राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरताना दिसत आहे. राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त कोरोना रुग्ण एकट्या मुंबईत सापडत आहेत. यामध्ये ओमायक्रॉन बाधितांचे प्रमाणही लक्षणीय आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असल्यामुळे साहजिकच लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. मुंबई शहरात ज्यावेळी दिवसाला कोरोनाचे २० हजार रुग्ण सापडून लागतील, तेव्हा मुंबईत लॉकडाऊन लागेल, असे इक्लाबसिंह चहल यांनी म्हटले.


मुंबईत सध्या दिवसाला ८ हजार नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या संसर्गाचा वेग पाहता २० हजाराचा टप्पा आठवडाभरातही गाठला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर मुंबईतील कोरोना निर्बंध कमालीचे कठोर करण्यात आले आहेत. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईतील इमारतींबाबत नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार एखाद्या इमारतीत १० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास ती संपूर्ण इमारत सील केली जाईल. कोरोना रुग्ण सापडलेल्या मजल्यावर घरातून बाहेर येण्यास आणि जाण्यास मज्जाव असेल. ज्या मजल्यावर कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे, त्या मजल्याच्या वरील आणि खालील मजल्यावरील सर्व रहिवाशांना पाचव्या किंवा सातव्या दिवशी कोरोना चाचणी करावी लागणार असल्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.



तर महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागणार?


राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महाराष्ट्रात तुर्तास लॉकडाऊनची गरज नसल्याचे म्हटले होते. मात्र, तशी वेळ आल्यास लॉकडाऊन लावण्याचे निकष कोणते असतील, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले होते. यापूर्वीचा अनुभव पाहता राज्यात जेव्हा दररोज कोरोना रुग्णांसाठी ८०० मेट्रिक टनची गरज लागेल, तेव्हा लॉकडाऊन लावायचा, हे ठरले आहे. पण ओमायक्रॉनच्या संसर्गाच वेग हा प्रचंड आहे. त्यामुळे ऑक्सिजन वापराची मर्यादेचे निकष ५०० मॅट्रिक टनापर्यंत खाली आणण्याविषयी विचार सुरु आहे. त्यामुळे भविष्यात दररोज ५०० मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासू लागल्यास महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागू होईल, अशी शक्यता राजेश टोपे यांनी वर्तविली होती.

Comments
Add Comment

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

पुढील दोन दिवस महत्त्वाचे! मुंबई, पुणे, दक्षिण कोकणसह राज्याच्या 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता, IMDचा ॲलर्ट

मुंबई : मुंबईमध्ये शुक्रवारी पावसाची उपस्थिती दिलासादायक होती. वीकेंडला एक-दोन ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

दिलासादायक! मुंबईत कोविड शून्य रुग्ण नोंद

कोविड सदृश्य अथवा तत्सम लक्षणे आढळल्यास कृपया योग्य ती काळजी घ्यावी : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे