देशात खनिज सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काबिल संस्था

नवी दिल्ली : देशात खनिज सुरक्षा सुनिश्चित व्हावी आणि महत्वाच्या तसेच धोरणात्मक दृष्ट्या आवश्यक अशा क्षेत्रात भारताला खनिज संपत्तीच्या बाबत स्वयंपूर्ण होता यावे, यासाठी, खाण मंत्रालयाने खनिज बिदेश इंडिया लिमिटेड (KABIL)-काबिल या नावाने,एक संयुक्त व्हेंचर कंपनी सुरु केली आहे. नॅशनल अल्युमिनियम कंपनी (NALCO), हिंदुस्थान कॉपर लिमिटेड (HCL), मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन (MECL) या कंपन्या हा संयुक्त उद्यमात सहभागी आहेत.


काबिलचा मुख्य उद्देश महत्वाच्या आणि आवश्यक अशा लिथियम, कोबाल्ट यांसारख्या खनिजांचा देशविदेशात शोध घेऊन ती मिळवण्याचा प्रयत्न करणे, हा आहे. तसेच, ई-वाहतूक, अक्षय ऊर्जा, औषधे, एअरोस्पेस, हवाई वाहतूक अशा महत्वाच्या क्षेत्रात, अशा क्षेत्रात आवश्यक असलेल्या खनिजांची पूर्तता करत, आत्मनिर्भर भारताला अधिक बळ दिले जात आहे.


स्वतंत्र संशोधन करून आणि निवडीचे निकष ठरवून, परदेशात खनिज संपत्ती संपादनाच्या शक्यतांचा शोध घेण्यासाठी स्त्रोत ठरू शकणाऱ्या देशांची यादी ठरवली जाते. आतापर्यंत, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, बोलिव्हिया आणि चिली यांसारख्या स्त्रोत देशांसोबत काबिलची चर्चा सुरु आहे, या देशांमध्ये भारताला आवश्यक असलेली खनिजे आहेत. प्राथमिक पातळीवर, संबंधित देशांचे दूतावास आणि तिथल्या सार्वजनिक संस्थांशी चर्चा करुन आवश्यक त्या माहितीची देवाणघेवाण केली जात आहे, जेणेकरुन, खनिज क्षेत्रांच्या बाबतीत गुंतवणूक करण्यासाठी योग्य ते निर्णय घेता येतील.

Comments
Add Comment

अयोध्येतील राम मंदिरावर उद्या ध्वजारोहण

ऐतिहासिक क्षणाला पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्येत मंगळवारी २५ नोव्हेंबर रोजी

‘आयएनएस माहे’ आज भारतीय नौदलात

मुंबई : भारतीय नौदलाची सामरिक ताकद अधिक भक्कम करणारा सोहळा सोमवारी पाहायला मिळणार आहे. माहे-क्लास अँटी सबमरीन

मेट्रो शहरांमधील विषारी हवेने मुलांच्या डोळ्यांचे आरोग्य धोक्यात!

नवी दिल्ली : वायू प्रदूषण आता केवळ श्वसनाचा धोका राहिलेला नाही, तर लहान मुलांच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत

'आयुष्मान भारत'अंतर्गत सत्तरीनंतर १० लाखांपर्यंत मोफत उपचार

नवी दिल्ली : भारतातील वैद्यकीय खर्च वाढला आहे, मात्र आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेने देशातील

‘सिंध पुन्हा भारताचा भाग होऊ शकतो’

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे सूतोवाच नवी दिल्ली : सध्या पाकिस्तानात असलेला ‘सिंध प्राप्त पुन्हा भारताचा

ऐतिहासिक! नव्या सरन्यायाधीशांच्या शपथविधीला ब्राझीलसह सात देशांचे मुख्य न्यायमूर्ती राहणार उपस्थित

नवी दिल्ली: भारताचे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत आज शपथ घेणार आहेत. भारताच्या ५३व्या