आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींचे लसीकरण

  95

ठाणे (वार्ताहर) : मुंबई महानगर क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणास सुरुवात होत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुला-मुलींनी लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन स्वत:बरोबरच कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षणासाठी सज्ज होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.


ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात दहा केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी दहाच्या सुमारास वर्तक नगर माध्यमिक विद्यालय येथे करण्यात येणार आहे.


जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय शहापूर, भिवंडी, ग्रामीण रुग्णालय मुरबाड तसेच प्रत्येक तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर होणार आहे. शहापूर तालुक्यातील वासिंद, अंबरनाथ तालुक्यातील वांगणी, कल्याण तालुक्यातील खडवली, भिवंडी तालुक्यातील आनगाव आणि मुरबाड तालुक्यातील शिवळा या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Local train: लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत अडकल्याने प्रवाशाचा मृत्यू

मुंबई: मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्थानकात एक दुर्देवी घटना घडली आहे. येथील लोकल आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत एक

दुर्गाडी किल्ल्याच्या भिंत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू

कल्याण : ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत अलीकडील मुसळधार पावसामुळे कोसळल्याने परिसरात चिंता निर्माण

कमी झालेल्या प्रवाशांमुळे बेस्ट भाडे कमी होणार!

तीन किलोमीटर पर्यंत प्रवास करणाऱ्यांना होणार फायदा मुंबई : बस भाडे कमी केल्यानंतर वाढणारा तोटा लक्षात घेता

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: विक्रोळीचा नवा पूल उद्यापासून खुला!

मुंबई: विक्रोळी येथील लालबहादूर शास्त्री (LBS) मार्गाला पूर्व द्रुतगती मार्गाशी (Eastern Express Highway) जोडणारा अत्यंत

प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी ६,७३१ सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर

लवकर सदनिका प्रकल्पबाधितांना सुपूर्द करण्याचे निर्देश मुंबई  : प्रकल्पबाधित कुटुंबांच्या निवासासाठी मुंबई

मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस

मुंबई  : मुंबई ते कोल्हापूर प्रवास आणखी आरामदायक होणार आहे. कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय.