आजपासून १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींचे लसीकरण

  103

ठाणे (वार्ताहर) : मुंबई महानगर क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील मुला-मुलींच्या लसीकरणास सुरुवात होत आहे. ठाणे जिल्ह्यातील मुला-मुलींनी लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन स्वत:बरोबरच कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षणासाठी सज्ज होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.


ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात दहा केंद्रांवर लसीकरण सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा शुभारंभ राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी दहाच्या सुमारास वर्तक नगर माध्यमिक विद्यालय येथे करण्यात येणार आहे.


जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय शहापूर, भिवंडी, ग्रामीण रुग्णालय मुरबाड तसेच प्रत्येक तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर होणार आहे. शहापूर तालुक्यातील वासिंद, अंबरनाथ तालुक्यातील वांगणी, कल्याण तालुक्यातील खडवली, भिवंडी तालुक्यातील आनगाव आणि मुरबाड तालुक्यातील शिवळा या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ९ महत्वाचे निर्णय !

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या

न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ, जरांगे मुंबईत येणार की नाही येणार लवकरच ठरणार

मुंबई : फडणवीस सरकारच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. उपसमितीचे

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालय उभारण्याची योजना

मुंबई : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय

'नांदेड-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार'

मुंबई : मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे नांदेड शहर