जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जाणार आहे. आजपासून हा सामना खेळवला जाणार आहे. मात्र पहिल्या दिवसाच्या खेळात पाऊस खलनायक ठरण्याची शक्यता आहे.
या कसोटी सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेची स्थिती करा किंवा मरा अशी असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम इंडियाकडे इतिहास रचण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ जोहान्सबर्ग कसोटी जिंकू शकला नाही, येथे त्यांचा पराभव झाला तर त्यांना मालिका देखील गमवावी लागेल. असे झाल्यास भारताविरुद्ध घरच्या मैदानावर हा त्यांचा पहिला कसोटी मालिका पराभव ठरेल. दुसरीकडे, द. आफ्रिकेने हा सामना जिंकल्यास जोहान्सबर्गमध्ये भारताने कसोटी सामन्यात पराभूत होण्याची ही पहिलीच वेळ असेल.
भारतीय संघ हा सामना जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ टीम इंडियाला असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून द. आफ्रिकन संघ आपल्या मालिकेतील आशा कायम ठेवू शकेल. आता उद्दिष्ट मोठे असताना कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ महत्त्वाचा ठरतो. पण, हे उद्दिष्ट पूर्ण होण्याआधी जोहान्सबर्गमधून येणाऱ्या बातम्या चांगल्या नाहीत. पहिल्या दिवसाच्या खेळात पाऊस खलनायक ठरण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…