उल्हासनगर (वार्ताहर) : अंबरनाथच्या डीएमसी कंपनीच्या आवारात एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रवी तिवारी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. अंबरनाथ पश्चिमेकडील बंद पडलेल्या डीएमसी कंपनीचे बोराक्स पावडर साठवण केंद्र होते. त्या ठिकाणी परिसरातील युवक क्रिकेट खेळण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांना डोक्यात दगड घातल्याने मृत्यू झालेल्या तरुणाचा मृतदेह दिसला.
त्यांनी तत्काळ वॉचमनला घटनेची माहिती दिली. त्यानंतर अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते, पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश गायकवाड यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. या प्रकरणी अज्ञात आरोपींच्या नावाने अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…