मुंबईतील सर्व शाळा ३१ जानेवारीपर्यंत पुन्हा बंद

मुंबई : कोरोना आणि ओमायक्रॉन विषाणूचा कहर आता पुन्हा एकदा वाढतो आहे. त्यातच ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका वाढला असून त्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई क्षेत्रातल्या दहावी, बारावी वगळता सर्व माध्यमिक शाळा ३१ जानेवारीपर्यंत पुन्हा बंद करण्याचा महत्त्वाचा निर्णय आज घेण्यात आला आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इयत्ता पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद राहतील, असे महानगरपालिकेचे आयुक्त आयएस चहल यांनी सांगितले.


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.१० वी व १२ वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा प्रत्यक्ष अध्यापनासाळी बंद ठेऊन ऑनलाईन पध्दतीने सुरू ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.


याबाबत एक पत्र जाहीर करण्यात आले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, सद्यस्थितीत जगातील काही देशामध्ये व बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रजातीचा प्रसार वाढत असल्याने मुंबईची एकूण लोकसंख्या तसेच या शहरात जगभरातून लोकांचे येणे जाणे सुरू असल्याने या नव्या प्रजातीचा प्रसार होऊ नये म्हणून कोरोनाचा (ओमिक्रॉन) वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इ.१० वी व १२ वी चे वर्ग वगळता अन्य वर्ग (इ. १ ली ते इ.९ वी व ११ वी ) असणा-या सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा दि. ०४ जानेवारी ते दि. ३१ जानेवारी २०२२ पर्यंत प्रत्यक्ष बंद ठेवण्यात येत आहेत.


तथापि, इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी या वर्गातील विद्याथ्याने प्रत्यक्ष शाळेत उपस्थित न राहता यापूर्वी दिलेल्या निर्देशाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने अध्ययन अध्यापनाचे कार्य सुरु राहणार आहे.


बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळेतील १५ ते १८ वर्ष वयोगट असलेल्या विद्यार्थ्याचे नियोजनानुसार लसीकरण केंद्रावर उपस्थित राहून लसीकरण सुरु राहणार आहे. याकरीता महापालिका शाळांसह अन्य खाजगी शाळांमधील लसीकरणास पात्र असणा-या १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्याचे लसीकरण करुन घेण्यासाठी शाळेत बोलवता येईल.

Comments
Add Comment

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :