तरुणीवर तीन मित्रांनीच केला सामुहिक बलात्कार

  108

अंबरनाथ :

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हत्येच्या घटनेने अंबरनाथ शहरात खळबळ माजली असतानाच दुसऱ्याच दिवशी शहरात सामुहिक बलात्काराची घटना घडल्याचे वृत्त आहे. एका तरूणीवर तिच्या तीन मित्रांनीच बलात्कार केला असून या तीनही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर भोगे यांनी दिली.

अंबरनाथ अतिरिक्त औद्योगिक परिसरात असलेल्या जीआयपी धरण परिसरात हा प्रकार घडला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती भोगे यांनी दिली. अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या शेजारी असणाऱ्या रेल्वेच्या ग्रेट इंडीयन पेनिनसुला धरणाच्या परिसरात रविवारी दुपारी ही तरुणी तीन मित्रांबरोबर फिरायला गेली होती. त्यावेळी त्यांनी तिच्यावर बलात्कार केला, अशी तक्रार याच तरूणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ तीन आरोपींना अटक केली. हे तीनही आरोपी २५ ते ३० वयोगटातील आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. या घटनेनंतर सलग दुसऱ्या दिवशी अंबरनाथ शहरात खळबळ माजली आहे.
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.