31 डिसेंबरला तळीरामांना मुंबई पोलिसांचा दणका

नवीन वर्षाच्या आगमनाची वाट पाहत असलेल्या प्रत्येकाच्याच आनंदावर निर्बंध लागले. मुंबईसह महाराष्ट्रात अचानक कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आणि त्यामुळे मुंबईसह राज्यात अनेक निर्बंध लागू करण्यात आले. या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्टसाठी कार्यक्रमांचं आयोजन न करणे, नाईट कर्फ्यू तसेच लोकांनी रस्त्यावर गर्दी करू नये कलम 144 लागू करण्यात आले.

सर्व निर्बंध लागू असतानाही थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी अनेक लोक घराबाहेर पडले पाहायला मिळाले. अशातच अनेक तळीरामांकडून वाहन चालवत वाहतूक नियमांची पायमल्लीही करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक नियमांतर्गत कारवाई व्हावी, यासाठी मुंबई पोलिसांनी शुक्रवारी रात्री अनेक ठिकाणी नाकाबंदी केली होती. यावेळी मुंबईत पोलिसांकडून निर्बंधांची पायमल्ली करणाऱ्यांवर आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, शुक्रवारी म्हणजेच थर्टी फर्स्टच्या रात्री अनेक वाहने रस्त्यावर होती आणि प्रत्येकाला नाकाबंदीतून जावे लागले. यावेळी तपासादरम्यान पोलिसांनी 18 जणांविरुद्ध दारु पिऊन वाहन चालवल्याप्रकरणी (Drink And Drive) रॅश ड्रायव्हिंगचे (Rash Driving) गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्या 408 जणांवर, ट्रिपल सीट बाईक चालवल्याप्रकरणी 16 जणांवर, तर मोटार वाहन कायद्याप्रमाणे वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 1 हजार 375 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Comments
Add Comment

अरबी शिकवणाऱ्या व्यक्तीवर अल्पवयीन विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

मुंबई: अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याच्या गंभीर आरोपाखाली मुंबई पोलिसांनी शिवडी येथील एका धार्मिक संस्थेतून

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर सोयी-सुविधांची कमतरता नको!

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांचे निर्देश मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६९ वा

डिसेंबर २०२८ नंतर सिग्नल फ्री आणि वाहतूक कोंडीशिवाय होणार प्रवास, महापालिकेच्या या प्रकल्पाची वाढतेय गती

मुंबई (खास प्रतिनिधी) : दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंडदरम्‍यान नवीन जोडमार्ग स्‍थापित होत आहे. पश्चिमेकडील

मुंबईत चार नवीन कबूतर खाने, पण बाकीचे बंद म्हणजे बंदच....

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील विद्यमान कबुतरखाने उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये बंद करण्यात आले आहेत. दरम्यान,

पवईतील एन्काऊंटरवर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा काय म्हणाले ?

मुंबई : पवईतील स्टुडिओत घडलेल्या ओलीस नाट्य आणि त्यानंतर झालेले आरोपी रोहित आर्य याच्या एन्काऊंटरवर अनेक प्रश्न

'वाचाळवीर' राऊतांना सक्तीची विश्रांती? महापालिका निवडणुकीपूर्वी ‘राजकीय ब्रेक’

प्रकृतीच्या कारणामुळे संजय राऊत दोन महिने सार्वजनिक जीवनापासून दूर राहणार; राजकीय वर्तुळात अनेक