जिल्ह्यात ग्रामीण भागात शाळा पुन्हा बंद होणार?

पालघर  : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णांचीसंख्या सतत वाढत असल्यामुळे ग्रामीण भागातील शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या १ डिसेंबरपासून काही शाळा व महाविद्यालये सुरू झाली होती. परंतु, कोविड १९ चा पुन्हा उद्रेक झाल्यामुळे पालकवर्ग आता चिंतेत सापडला आहे.



गेल्या दोन दिवसांत पालघर जिल्ह्याचा ग्रामीण भाग व वसई-विरार शहर मनपा क्षेत्रात सुमारे २२० रुग्ण सापडले. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एसटी सेवा बंद असल्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असते. त्यात आता प्रादुभार्वाला पुन्हा वेग आल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे शहरी भागात पुन्हा ऑनलाइन शिक्षण प्रणाली पुन्हा सुरू करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



दरम्यान, ग्रामीण भागात मात्र ही व्यवस्था स्वीकारणे व्यवहार्य ठरू शकणार नाही. कारण जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोबाइलची रेंज नसणे, इंटरनेटची सुविधा नसणे व अधूनमधून विजेचा लपंडाव अशा कारणांमुळे ही व्यवस्था कुचकामी ठरते. गेल्या वर्षी सरकारने प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. तसेच, ग्रामीण भागातील मुलांनादेखील अशा पद्धतीने शिक्षण घेण्यात फारसे स्वारस्य नसते. त्यामुळे या सर्व शाळा बंद होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल