नारायण राणे महाविकास आघाडीला धक्का देणार?

कणकणवली: संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची आज मतमोजणी होणार. या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप, हे  महाविकास आघाडीला धक्का द्यायला सज्ज झाले आहेत.

गुरुवारी झालेल्या निवडणुकीत एकूण ९८१ पैकी तब्बल ९६८ मतदारांनी म्हणजे ९८.६७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ११५ महिला व ८५३ पुरुषांचा समावेश होता.  कणकवली वगळता कुठेही गालबोट लागलं नाही. शांततेत मतदान प्रकिया पार पडली.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत जिल्हा बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह एकूण १४ विद्यमान संचालक निवडणूक रिंगणात उभे आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी, काँग्रेस या महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल विरुद्ध भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनेल यांच्यात चुरशीची लढत होत आहे. मतदारांचा कौल कुणाला? याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

आज, शुक्रवारी ओरोस येथे सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणी ओरोस येथे शिक्षक पतपेढी सभागृहात मतमोजणी होणार आहे.
Comments
Add Comment

Bhimashankar Temple: ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद; जाणून घ्या कारण

पुणे: महाराष्ट्र जिल्ह्यातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर मंदिर या महिन्यात महाशिवरात्री

महाशिवरात्रीला भीमाशंकर मंदिर बंदच

पुणे  : श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर महाशिवरात्रीच्या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहणार

एसटीच्या नव्या बसेसचे नामकरण 'राजमाता जिजाऊ'; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासाला आधुनिकतेची जोड देत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या

Palghar: पालघरमध्ये धक्कादायक प्रकार उघड; औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी, मुद्देमाल जप्त

पालघर: पालघरमध्ये धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. औषधांच्या नावाखाली दारूची तस्करी सुरु असल्याचा हा प्रकार समोर

अनाथाश्रमात राहिलेला मुलगा झाला नेदरलँडचा महापौर, आईला शोधत ४० वर्षांनी नागपूरला आला

नागपूर : नेदरलँड्समधील हीमस्टेडचे ​​महापौर फाल्गुन बिनेन्डिज्क तब्बल ४० वर्षांनंतर जन्मदात्या आईचा शोध घेत

Jalna Food Poisoning: पाणीपुरी खाल्ल्याने १६ जण रुग्णालयात, जालन्यात नेमकं घडलं काय?

जालना: जालन्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्बल १५ ते १६ जणांना उलट्या-जुलाबाचा