सारस्वत बँकेत 300 क्लर्क पदांसाठी भरती

मुंबई: बँकेत जॉब शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची नामी संधी. सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडनं लिपिक संवर्गातील कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग आणि ऑपरेशन्स) च्या 300 पदांच्या भरतीसाठी आज, म्हणजेच 31 डिसेंबर 2021 रोजी अर्ज प्रक्रिया समाप्त करणार आहे. पात्र उमेदवार सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेद्वारे कनिष्ठ अधिकारी पदासाठी अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या एकूण 300 पदे भरण्यात येणार आहेत. जर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा असेल किंवा त्यांच्याबद्दल तपशीलवार माहिती मिळवायची असेल, तर तुम्ही सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

येथे हे देखील नमूद करणे आवश्यक आहे की, सारस्वत सहकारी बँकेच्या कनिष्ठ अधिकारी पदांसाठी 22 डिसेंबर 2021 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. तसेच या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 आहे. शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा अन्यथा तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असं बँकेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. या भरती प्रक्रियेतून एकूण 300 पदं भरली जाणार आहेत.

नोकरीसाठी पात्रतेची अट 



ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून पदवी पूर्ण केलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवाराला या क्षेत्रात किमान 1 वर्षाचा कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारांना वयाची अटही बँकेच्या वतीनं घालण्यात आली आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं वय 30 वर्षांच्या आत असणं गरजेचं आहे.
Comments
Add Comment

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री

चैत्यभूमीवर गर्दी टाळण्यासाठी दादरमधील वाहतुकीत बदल

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर गर्दी लक्षात घेता वाहतूक