आता महाराष्ट्राकडे सत्ता आणण्याकडे लक्ष

  63

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचं वर्चस्व पाहायला मिळल्यानंतर  नारायण राणे यांनी पहिली प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. माध्यमांशी बोलताना नारायण राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर माझी सत्ता नाही आली,  भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आहे. आता लक्ष महाराष्ट्रात सत्ता आणण्याकडे आहे.

हा विजय नितेश राणे, निलेश राणे, राजन तेली यासगळ्यांनी साथ दिली म्हणून झाला. तसंच जनता, जिल्हा आणि आमच्या देव देवतांनी दिली साथ दिली म्हणून हा विजय झाला. सिंधुदुर्गचा हा विजय म्हणजे आमचा देवदेवतांचा विजय आहे.

तसंच हा विजय मिळवताना अकलेचा वापर झाला म्हणून जिंकलो, याला अक्कल म्हणतात असा टोला यावेळी नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लगावला....

यावेळी नारायण राणे विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राणे म्हणाले की, सगळ्यांना पुरून उरलो आणि केंद्रापर्यंत पोहचलो. आतापर्यंत थांबलो नाहीय.

राज्य सरकारवर टीका करताना राणे म्हणाले की, यांची लायकी फक्त पोस्टर लावण्याची.

महाराष्ट्राला सध्या मुख्यमंत्री नाही. राज्याची वाटचाल अधोगतीकडे चालली आहे. ३६ मतं मिळत नाहीत आणि विधानसभेची भाषा करतात. राज्यात भाजपची सत्ता हवीय, 'लगान'ची टीम नको  असा अशा शब्दात नारायण राणे यांनी राज्य सरकारवर टिका केली आहे.
Comments
Add Comment

Eknath Shinde: उत्तराखंडमध्ये अडकलेल्या मराठी बांधवांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरसावले 

मराठी पर्यटकांशी फोनवरून संवाद साधत, त्यांना शक्य ती सारी मदत पोहचवण्याची ग्वाही मुंबई: उत्तराखंडमध्ये

म्हाडा छत्रपती संभाजीनगर, नाशिक मंडळातर्फे १४१८ निवासी सदनिका व भूखंडांसाठी सोडत

सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणीसह अर्ज भरणा प्रक्रिया सुरू मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक छत्रपती संभाजीनगर व

Devendra Fadanvis : कोंचिग क्लासमधील लैंगिक छळाप्रकरणी SIT स्थापन करणार; नराधमांना कठोर शिक्षा देणार : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : बीडमध्ये खासगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक

Pratap Sarnaik: आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

एसटी कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करणार - प्रताप सरनाईक  मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री.

Monsoon Update : विदर्भात मान्सून निराशाजनक; नागपूरसह पाच जिल्हे रेड झोनमध्ये? शेतकरी चिंताग्रस्त!

नागपूर : विदर्भात यंदा मान्सूनचे अपेक्षेपेक्षा पंधरा दिवस लवकर आगमन झाल्यानंतर शेतकरी व सामान्य जनतेला

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या