प्रशासन अद्याप निद्रावस्थेत

  90

पालघर : पालघर जिल्ह्यात कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढत असून जिल्हा प्रशासन व वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासन याविषयी कशाप्रकारची तयारी करत आहे, याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. काल दिवसभरात वसई विरार शहर मनपा क्षेत्रात ८१ तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात १० रुग्ण सापडल्याचे वृत्त आहे. पण या दोन्ही प्रशासनाच्या माहिती कार्यालयाकडून अधिकृतपणे माहिती दिली जात नाही.गेल्या दीड वर्षाच्या कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात, हे दोन्ही प्रशासन संवेदनशील नव्हते. त्यामुळे जिल्हावासीयांना या काळात अनंत अडचणींना सामोरे जावे लागले.


वास्तविक गेल्या आठवड्यापासून राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने राज्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविल्यानंतर प्रशासनाने जिल्ह्यात कोरोनाची काय स्थिती आहे, याबाबत अपडेट देणारे पत्रक दररोज प्रसिद्धीस देणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर या दोन्ही प्रशासनाने आपल्या माहिती कार्यालयातर्फे अपडेट देणे बंद केले.


परंतु आता प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे ही व्यवस्था पुन्हा सुरू करणे, आवश्यक होते; पण त्यादृष्टीने कोणतीही हालचाल झालेली नाही. या दोन्ही प्रशासनाचा मागील अनुभव कटू असल्यामुळे नागरिकांच्या मनात भीती आहे. कोविड सेंटर पुन्हा सुरू करणे, टेस्टिंग करणारी यंत्रणा कार्यान्वित करणे, दररोज कोरोना रुग्णांची मृत्यू व नव्या रुग्णाची संख्या, याविषयी प्रसिद्धी पत्रके माध्यमांना देण्यास सुरुवात करणे, आदी त्वरेने करण्याची गरज आहे.

Comments
Add Comment

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत

Mumbai Building Collapse: मदनपुरात चार मजली इमारत कोसळली, परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या गजबलेल्या परिसरात येत असलेली एक जुनी इमारत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील मदनपुरा

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी