नारायण राणे यांना नोटीस देणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करा : देवेंद्र फडणवीस

मुंबई  : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस देऊन साक्षीसाठी बोलावले हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे ही नोटीस पाठविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


दरम्यान सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवले आहे का? असा सवाल करत, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला साक्षीसाठी पोलीस ठाण्यात बोलावता येत नाही, त्यांची साक्ष घरी जाऊन घ्यावी लागते, हे नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक विसरले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. फडणवीस यांनी ही माहिती ट्वीटरच्या माध्यमातून दिली आहे.


फडणवीस म्हणाले, सिंधुदुर्ग पोलिसांनी कायदा पाळायचाच नाही, असे ठरवलेले दिसतेय. राणेंना सीआरपीसी १६० ची नोटीस देणारे पोलीस जाणीवपूर्वक विसरलेत की, ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये साक्षीसाठी बोलावताच येत नाही. त्यांची साक्ष घरी जाऊनच घ्यावी लागते. त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस देऊन ठाण्यात साक्षीसाठी बोलावणे हा कायदेशीर अपराध आहे. म्हणून आता ज्या अधिकाऱ्याने हे केलेय, त्याच्यावर आयपीसी १६६ए अंतर्गत एफआयआर नोंदवला जावा, अशी आमची मागणी आहे.


दरम्यान असे न केल्यास भाजप सीआरपीसी १५६(३) अंतर्गत खटला दाखल करेल, तसेच हे जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने करण्यात आले असेल, तर त्यांना सुद्धा आयपीसी ३४ अन्वये सहआरोपी बनविण्यात यावे, अशीही आपण मागणी करू, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

शरद पवारांसाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाचा नकार

मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी राज्यसभा सोडण्यास उबाठा गटाने नकार दिल्यामुळे महाविकास आघाडीत संघर्ष

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक

एआय तंत्रज्ञानाने रोखणार वाघ-बिबट्यांचे हल्ले; प्रवीण दरेकरांच्या सूचनेवर सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्रप्रकल्पात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) सहाय्याने राबवण्यात आलेला

महाराष्ट्रात मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर होणार कारवाई - शिक्षण मंत्री दादाजी भुसे

सर्व माध्यमे, सर्व भाषिक आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी बंधनकारक मुंबई : "महाराष्ट्रातील सर्व