मुंबईत 7 जानेवारीपर्यंत जमावबंदी

  82

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत आजपासून कलम 144 लागू करण्यात आला आहे. आता मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी 7 जानेवारी 2022 पर्यंत लागू राहणार आहे. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. 30 डिसेंबर 2021 च्या मध्यरात्री बारा वाजल्यापासून 7 जानेवारीच्या रात्री बारा वाजेपर्यंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या सर्व जागी हे आदेश लागू असतील, असं आदेशात म्हटलं आहे.


या आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असेल. याशिवाय महामारी कायदा 1897 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि इतर कायदेशीर तरतुदींखालील कारवाई केली जाईल, असंही यात म्हटलं आहे.मुंबई पोलिसांनी आधी 31 डिसेंबरपर्यंत मुंबईमध्ये जमावबंदी लावली होती त्यानंतर त्याचा कालावधी वाढवून सात जानेवारीपर्यंत मुंबईमध्ये जमा बंदी लावण्यात आली आहे ज्यामुळे आता पाच पेक्षा अधिक लोक जमू शकणार नाहीत. तसेच मुंबईमध्ये होणारी सार्वजनिक कार्यक्रम सभा यासाठी सुद्धा शासनाकडून नियम आणि अटी शर्ती घालण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

Ahmedabad plane crash: टाटा सन्स मृतकांच्या वारसांना देणार १ कोटींची मदत

अपघातात क्षतीग्रस्त झालेले रुग्णालय देखील उभारणार टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांची घोषणा मुंबई :

अल्पसंख्याक महाविद्यालयांवरील सामाजिक आरक्षणाला उच्च न्यायालयाची तूर्त स्थगिती

मुंबई : राज्यातील अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी लागू करण्यात आलेल्या सामाजिक

व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी नागालँडहून तिघे अटकेत; दीड कोटींच्या खंडणीमागणीचा पर्दाफाश

मुंबई : मुंबईतील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडून दीड कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा

सुरक्षिततेसाठी असणारे बेरिकेट्स ठरताहेत धोकादायक

वाहन चालकांसह प्रवाशांना डोकेदुखी कांदिवली  : कांदिवली विभागात मुख्य मार्गांवर, रस्त्यावर, नाक्यावर तसेच

मेट्रो ३ चा दुसरा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतरही प्रवाशांची प्रतीक्षाच

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेवरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानचा 'टप्पा २ अ' वाहतूक

‘तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक निणर्य घेणार'

मुंबई : तृतीयपंथीयांच्या विविध समस्या सोडविण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्यासाठी तृतीयपंथीय हक्कांचे