सहा महिन्यांत महाराष्ट्रात दगावले २३ वाघ

मुंबई  : महाराष्ट्रात तर अवघ्या सहा महिन्यांत म्हणजे जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ या कालावधीत २३ वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या २३ वाघांपैकी १५ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने, चौघांचा विष वापरामुळे, दोन वाघांचा शिकारीमुळे, एका वाघाचा रेल्वे अपघातात, तर एकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता.



सरत्या वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये देशभरात एकूण १२६ वाघांचा मृत्यू झाला. वाघांच्या मृत्यूची संख्या गेल्या एका दशकातील सर्वाधिक आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणकडून या वर्षी २९ डिसेंबरपर्यंतची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, १२६ मोठ्या वाघांपैकी ६० वाघ हे शिकारी, अपघात आणि संरक्षित क्षेत्राबाहेर मानव-प्राणी संघर्षाला बळी पडले आणि त्यात त्यांना जीव गमावावे लागले.



२०१८ च्या जनगणनेनुसार, भारतात २,९६७ वाघ होते. एनटीसीएने २०१२ पासून सार्वजनिकरित्या वाघांच्या मृत्यूची नोंद ठेवली आहे. यावर्षी वाघांच्या मृत्यूची संख्या दशकातील सर्वाधिक असू शकते, अशी शक्यता मध्यंतरी वर्तवण्यात आली होती. याचे कारण म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत तब्बल ९९ वाघांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी २०१६ मध्ये सर्वाधिक वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तेव्हा ती संख्या १२१वर होती. दरम्यान, वाघांचे वाढते मृत्यू हे चिंतेचा विषय ठरू शकतात. त्यामुळे वाघांच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

Comments
Add Comment

चेंबूरमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून मजूर पडल्याने महापौरांनी दिले कडक कारवाईचे आदेश

मुंबई: चेंबूर येथील सुभाष नगर परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून सहा मजूर पडले. या दुर्घटनेत एकाचा

BMC : आयुक्तांची प्रत्यक्ष भेट,सभागृहात नगरसेवकांची गरमागरमी, त्यानंतरही दादर रेल्वे स्थानकाबाहेर फेरीवाले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांनी दादरसह माटुंगा परिसरातील फेरीवाल्यांवरील

BMC : मुंबईत सव्वा लाख मुलींना देणार एचपीव्ही लस

- राष्ट्रीय मोहिमेचा शनिवारी झाला शुभारंभ - पहिल्या टप्प्यात महापालिका शाळांमधील सुमारे २५ हजार मुलींचा

Food delivery staff : ऑनलाईन फूड डिलिव्हरी कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी सक्तीची

मुंबई : राज्यात ऑनलाईन खाद्यपदार्थ वितरण करणाऱ्या कंपन्यांना यापुढे कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी बंधनकारक

आता मुंबईत धावणार पत्रकार-कॅमेरामनसाठी स्वतंत्र अॅम्ब्युलन्स

- मुख्यमंत्री फडणवीस, शिंदेंनी केले सेवेचे लोकार्पण.... - 'आरबीजी फाउंडेशन-टीव्हीजेए'चा उपक्रम; लालबागचा राजा

Niranjan Davkhare : मुंबई-ठाणेकरांचा मेट्रो प्रवास लवकरच सुसाट! 'मेट्रो-४' प्रकल्पाच्या टप्प्याटप्प्याने उद्घाटनाचे सरकारचे नियोजन

मुंबई : मुंबई आणि ठाणे या जोडशहरांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर करणाऱ्या 'मेट्रो-४' (ग्रीन लाईन) प्रकल्पाचे काम