‘बालहट्टा’पायी मुंबई मेट्रोचे काम अडकले

मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून खासदार असणाऱ्या मनोज कोटक यांनी कानपूर मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाच्या पार्श्वभूमीवर ‘बालहट्टा’पायी मुंबई मेट्रोचे काम अडकल्याचा टोला लगावला आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी कानपूर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. मागील दोन वर्षांपासून या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू होते. उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेट्रोतून फेरफटका मारला. यावेळी त्यांच्यासोबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी हे देखील उपस्थित होते.


आयआयटी मेट्रो स्टेशन ते गीता नगर असे अंतर त्यांनी मेट्रोने प्रवास करत पार केले. जानेवारी २०२२ मध्ये या मेट्रोचा पुढचा टप्पा कार्यन्वयित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी दिवसभर या मेट्रो उद्घाटनाची चर्चा सोशल मीडियावर रंगलेली दिसली. मात्र, याच मेट्रोच्या उद्घाटनावरून भाजपच्या एका आमदाराने राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला टोला लगावला आहे.
“कानपूर मेट्रोचे बांधकाम २०१९ मध्ये सुरु झाले होते, सेवा सुरू झाली. मुंबईमधील मेट्रो तीनच्या मार्गीचं काम मागील अनेक वर्षांपासून सुरू असून बालहट्ट आणि अहंकारामुळे या कामात अडथळे येताहेत,” असा टोला कोटक यांनी लगावला आहे.


इतकचं नाही तर पुढे कोटक यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय. “महाविकास आघाडीमध्ये नेतृत्वाची कमतरता आहे. मात्र यामध्ये भाजपने कायमच आपली ताकद दाखवलीय. मग ते उत्तर प्रदेशमधील योगीजी असो किंवा महाराष्ट्रामधील देवेंद्र फडणवीसजी असो,” असं कोटक म्हणालेत.

Comments
Add Comment

टीईटीच्या निकालात यंदा ८.५३ टक्के उमेदवार पात्र

पावणेचार लाख उमेदवारांनी दिली परीक्षा उत्तीर्ण बंधनकारक केल्याने वाढली संख्या मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या

महापौरपदाची सोडत चक्राकार पद्धतीने?

या पध्दतीत खुल्या गटातील महापौराची शक्यता कमी मुंबई : मुंबईच्या महापौरपदासाठी येत्या २२ जानेवारी रोजी आरक्षण

श्री सिद्धिविनायक मंदिरात ‘माघी गणेश जयंती महोत्सवा'स सुरुवात

गायन, वादन, शोभायात्रांसह आठवडाभर चालणार धार्मिक सोहळा मुंबई : प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरात

माघी श्रीगणेशोत्सव २०२६ करता कृत्रिम तलावांसह विविध सुविधा सज्ज

मुंबई : माघी श्रीगणेशोत्सव २२ जानेवारी २०२६ पासून साजरा करण्यात येणार आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा

मुंबई पालिकेच्या शैक्षणिक इतिहासात नवा टप्पा

सीबीएसईच्या पहिल्या १० वीच्या बॅचसाठी ३६६ विद्यार्थी तयार मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात

बस पुरवण्यासह चार्जिंग स्टेशनचे कामही पुरवठादाराकडून रखडले

ठोस कारवाई करण्यास एसटी महामंडळ धजावत नसल्याची चर्चा मुंबई :राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या ई-बस प्रकल्पाचा