कसा झाला जतीन खन्नाचा सुपरस्टार राजेश खन्ना?

मुंबई : आज सुपरस्टार राजेश खन्ना यांची ७९ वी जयंती आहे.  29 डिसेंबर 1942 रोजी पंजाब अमृतसर येथे जन्मलेल्या राजेश खन्ना यांचं खरं नावं जतीन खन्ना....जेव्हा शम्मी कपूरराज कपूरदेवआनंद यासारख्या स्टार्सची चलती इंडस्ट्रीमध्ये ओसरू लागली होती तेव्हाच हिंदी सिनेमांमध्ये राजेश खन्ना नावाच्या सुपरस्टारचा जन्म झाला.......ऑल इंडिया युनायटेड प्रोड्युसर्स टॅलेंट कॉम्पिटिशन जिंकून जतीन खन्नाने सिनसृष्टीमध्ये प्रवेश केला आणि याच जतीन खन्नाने पुढे राजेश खन्ना बनून हिंदी सिनेसृष्टीवर राज्य केलं.....1966 मध्ये आखिरी खत सिनेमातून त्यांनी हिंदी सिनेमांमध्ये पदार्पण केलं...या सिनेमातून राजेश खन्ना झळकले असले तरी त्यांनी साईन केलेला पहिला सिनेमा होता राज... सुरुवातीला कॅमेऱ्याला घाबरणाऱ्या, डायलॉग बोलताना भंबेरी उडणाऱ्या राजेश खन्नाची पुढे हिट झाली ती डायलॉगबाजीच.

युनायटेड प्रोड्युसर्स टॅलेंट कॉम्पिटिशनच्या कराराप्रमाणे राजेश खन्ना यांना औरतडोली आणि इत्तेफाक यासारख्या सिनेमांमधून काम मिळालं...मात्रबहारों के सपने या सिनेमातून राजेश खन्ना हे नाव अधिक चर्चिलं गेलं...हा सिनेमा प्रेक्षकांना इतका आवडला की दुस-याच आठवड्यात या सिनेमाचा शेवट चित्रपटाच्या निर्माता दिग्दर्शकांना दु:खाऐवजी हॅपी एंडने करावा लागला. यानंतर राजेश खन्ना झळकला तो आराधना सिनेमातून ...आणि एक नवा सुपरस्टार हिंदी सिनेमांना मिळाला....शक्ती सामंता यांचं दिग्दर्शन, रोमान्स आणि ट्रॅजेडी असा कथेतला मसाला, एकापेक्षा एक सरस गाणी आणि गाण्याइतकीची फ्रेश वाटली ती या गाण्यावर झळकलेली जोडी...राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर...

त्यानंतर कटी पतंग, दाग, अमर प्रेम, सच्चा झुठा, आन मिलो सजना यासारखे अनेक सुपरहिट फिल्मस दिले. 

राजेश खन्ना यांच्या यशामध्ये मोलाचा वाटा आहे तो अभिनेत्री मुमताज यांचा....या दोघांची ऑन स्क्रीन केमेस्ट्री अफलातून हिट ठरली.....या दोघांनी एक नवा इतिहास हिंदी सिनेमांमध्ये रचला....दो रास्तेबंधनसच्चा झुटादुश्मन, हाथी मेरे साथी, बावर्ची, अपना देशरोटीआप की कसमप्रेम कहानी यासारख्या हिट फिल्मस या दोघांनी दिल्या........

हृषीकेश मुखर्जी यांच्या आनंद सिनेमामध्ये राजेश खन्ना यांच्यामधल्या संवेदनशील अभिनेत्याचं एक वेगळंच आणि भारावून टाकणारं दर्शन घडलं
Comments
Add Comment

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५

आजपासून मुंबईत 'इंडिया मेरीटाईम सप्ताह', केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : शंभराहून अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, ५०० प्रदर्शक, २०० पेक्षा अधिक तज्ज्ञ

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी

सलमान खानच्या रियाधमधील भाषणावर वाद: पाकिस्तानच्या दहशतवादी यादीत नाव असल्याचे दावे खोटे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अलीकडील एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातील विधानामुळे सोशल मीडियावर वाद

समुद्रात जाणे टाळा ! हवामान विभागाचा मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,