रिलायन्स उद्योगसमूहाची सूत्रे लवकरच नव्या पिढीकडे जाणार ?

मुंबई : रिलायन्स उद्योगसमूहाची सूत्रे लवकरच नव्या पिढीकडे जाणार असल्याची चर्चा रंगते आहे. रिलायन्स उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी तसे संकेतच दिले आहेत. रिलायन्सची सूत्रे नव्या पिढीच्या हाती सोपवण्यासाठीच्या प्रक्रियेला इतर वरिष्ठ सहकाऱ्यांच्या मदतीने वेगवान करणार असल्याचे म्हटले. रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या जयंतीनिमित्ताने मंगळवारी आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले.


मुकेश अंबानी यांनी यावेळी म्हटले की, मोठी स्वप्ने आणि लक्ष्य पूर्ण करण्यासाठी योग्य लोकांना सोबत घेणे आणि योग्य नेतृत्व असणे आवश्यक आहे. रिलायन्स समूह महत्त्वपूर्ण नेतृत्व बदलाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले. माझ्या पिढीतील सहकाऱ्यांच्या हातातून नव्या पिढीच्या हाती सूत्रे सोपवण्याची ही प्रक्रिया असणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी म्हटले.


मुकेश अंबानी यांनी संपत्ती वाटपाबाबतची प्रक्रिया सुरू केली असल्याचे वृत्त मागील महिन्यात समोर आले होते. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांनी वॉल्टन परिवाराने अवलंबलेल्या संपत्ती वाटपाच्या सूत्राला पसंती दिल्याचे वृत्त होते. याच सूत्राच्या आधारे रिलायन्समध्ये नेतृत्व बदल आणि संपत्ती वाटप होणार असल्याची चर्चा आहे. रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकलपासून दूरसंचार, ई-कॉमर्स आणि ग्रीन एनर्जीच्या उद्योगात रिलायन्स उद्योगसमूह कार्यरत आहे.


मुकेश अंबानी यांना ईशा अंबानी-पिरामल, आकाश आणि अनंत ही तीन मुले आहेत. हे तिन्ही जण रिलायन्स उद्योगसमूहात सक्रिय असून महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. मुकेश अंबानी हे कुटुंबाच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करून एका ट्रस्टसारख्या संस्थेत रुपांतर करण्यावर विचार करत असल्याचे वृत्त आहे. ही ट्रस्ट रिलायन्स उद्योगसमूहाचे व्यवस्थापन करणार असल्याची चर्चा आहे.

Comments
Add Comment

महिलेने अंतर्वस्त्रात लपवले लाखोंचे सोने! दिल्ली विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर

नवी दिल्ली: दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विमानतळावरील

अरे बापरे! देशभरात २२ बनावट विद्यापीठे

यूजीसीकडून देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देशातील २२ बनावट

फक्त ६ वर्षांच्या मुलांनाच पहिलीत प्रवेश

दिल्ली सरकारने पहिलीच्या प्रवेशासाठी वयोमर्यादा केली निश्चित नवी दिल्ली  : दिल्ली सरकारने शालेय शिक्षणात एक

अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान मोदी फडकवणार धर्म ध्वज

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत प्रमुख पाहुणे अयोध्या  : अयोध्येतील राम मंदिराच्या शिखरावर होणाऱ्या

न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे पुढील सरन्यायाधीश! चार दशकांहून अधिक अनुभव असणारे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या कार्याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

नवी दिल्ली: देशाचे विद्यमान सरन्यायाधीश भूषण गवई यांनी सरन्यायाधीश हा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही

राम मंदिराच्या दर्शनाची वेळ बदलली , जाणून घ्या अयोध्यातील दर्शनाची वेळ...

अयोध्या : अयोध्येतील श्रीराम मंदिर म्हणजे श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम. दिवसेंदिवस प्रभू रामाचे दर्शन