लोणावळ्यात थर्टी फर्स्टला हॉटेल्स, रिसॉर्ट फूल

  68

पुणे : थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर नाताळच्या सुट्या आल्याने पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. लोणावळा-खंडाळ्यात नाताळच्या सुट्या, तसेच नववर्षाच्या पूर्वसंध्येस परिसरातील हॉटेल, रिसॉर्टच्या बुकिंग, तसेच अनेक सेकंडहोम हाउसफुल झाले असून, बुकिंग सरासरी साठ ते सत्तर टक्क्यांपर्यंत झाले आहे. थर्टी फर्स्टला हॉटेल्स, रिसॉर्ट फूल होतील, अशी आशा आहे.सरत्या वर्षास निरोप देण्यासाठी तसेच जुन्या वर्षातील कटू आठवणी विसरत, नव्या वर्षाच्या स्वागतास पर्यटन नगरी लोणावळा सज्ज होत आहे. लोणावळ्याचे अर्थकारण प्रामुख्याने पर्यटनावर अवलंबून आहे.

नूतन वर्षानिमित्त मौजमजा करण्यासाठी, तसेच येथील प्रसिद्ध चिक्कीचा आस्वाद घेण्यासाठी लोणावळ्यात पुणे, मुंबईसह परराज्यांतून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. यादरम्यान सेकंड होम बरोबरच बहुतांशी हॉटेल, तसेच खासगी बंगल्यांमध्ये त्यांचे वास्तव्य असते.पवन मावळ, राजमाची, लोहगड, विसापूर, तुंग, कोराईगडसह लोणावळ्यातील विशेषतः लायन्स पॉइंट, खंडाळा येथील सनसेट पॉइंट येथे पर्यटकांसह हौशी ट्रेकरची पसंती आहे. पर्यटकांचे हॉटेल व रिसॉर्टपेक्षा खासगी बंगल्यांनाच अधिक प्राधान्य मिळत असल्याचे चित्र आहे.
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.