थंडीमुळे अनेकजण सांधेदुखीच्या त्रासाने हैराण

ठाणे (वार्ताहर) : हिवाळ्यातील थंडी प्रत्येकाला हवीहवीशी वाटत असली तरी काही जणांसाठी हवेतील हा गारवा वेदनादायी ठरत आहे. कारण, हिवाळ्यात थंडीमुळे अनेक लोकांना सांधेदुखीचा त्रास उद्भवत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.



संधिवात असलेल्या रुग्णांसाठी हा काळ अतिशय अवघड असतो. त्याचप्रमाणे यंदा सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. यामुळे अनेकांना सांधेदुखीचा त्रासही सुरू झाला आहे. गुडघे व सांध्यांच्या दुखण्याने हैराण झालेले अनेक रुग्ण सध्या उपचारासाठी रुग्णालयात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



थंडी वाढल्याने विशेषतः वातरक्त आणि आमवात यांसारखे आजार आहेत. त्यांना थंडीत खूपच त्रास होतो. ज्यामुळे वेदना, सूज, जळजळ आणि सांधे कडक होणे अशा समस्या उद्भवतात. थंडीमध्ये सतत मांसाहार किंवा अधिकाधिक गोड पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तवात होण्याची शक्यता असते. युरिक अॅसिडमध्ये खर (क्रिस्टल) तयार होतात. ही खर रक्तात विशेषकरून जेथे हाडांचे जॉईंट्स असतात तेथे अडकते आणि वेदना सुरू होतात.



यावेळी डॉ. अभय गायकवाड म्हणाले यांनी, थंडी सुरू झाल्यापासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हिवाळ्यात सांधेदुखीचा धोका अधिक असल्याचे म्हटले आहे.

Comments
Add Comment

पुण्यातील कचरावेचक कामगार अंजू माने यांनी १० लाखांची बॅग परत करून दिला मानवतेचा संदेश

पुणे : जिथे दैनंदिन जीवनात पैशासाठी लोक अनेकदा अनैतिक मार्ग स्वीकारताना दिसतात, तिथे पुण्यातील एका मेहनती

Local Train Block : मध्य रेल्वेवर आजपासून १२ दिवसांचा ब्लॉक! चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी: 'या' लोकल रद्द, घरातून निघण्यापूर्वी 'हे' वेळापत्रक तपासा!

मुंबई : मुंबईच्या लाखो चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. रेल्वे

Mahim Station Fire : हार्बर लाईन सेवा ठप्प! माहिम रेल्वेस्थानकाजवळ नवरंग कंपाऊंडमध्ये मोठी आग; लोकल वाहतुकीवर परिणाम, व्हिडिओ व्हायरल

मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात आज, २२ नोव्हेंबर रोजी माहिम रेल्वे स्थानकाजवळ एक मोठी आग लागल्याची गंभीर घटना

भायखळ्यात उबाठा आणि शिवसेनेतच होणार लढाई, कोणत्या जागांवर असेल, कुणाचा पत्ता कापला जाणार? जाणून घ्या

मुंबई (सचिन धानजी) : दक्षिण मुंबईतील भायखळा विधानसभेत उबाठाचे मनोज जामसूतकर हे आमदार म्हणून निवडून आले. लोकसभा

पवई तलावातील जल प्रदूषण रोखणार, ईस्ट इंडिया कंपनीची महापालिकेने केली निवड

मुंबई (सचिन धानजी): पवई तलावात होणारे मलमिश्रित सांडपाण्याचे प्रदुषण कमी करण्यासाठी आता पवई येथील सध्या बंद

महापालिका निवडणूक प्रभाग आरक्षणावर आल्या फक्त १२९ हरकती सूचना

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणुकी करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली होती.