थंडीमुळे अनेकजण सांधेदुखीच्या त्रासाने हैराण

  137

ठाणे (वार्ताहर) : हिवाळ्यातील थंडी प्रत्येकाला हवीहवीशी वाटत असली तरी काही जणांसाठी हवेतील हा गारवा वेदनादायी ठरत आहे. कारण, हिवाळ्यात थंडीमुळे अनेक लोकांना सांधेदुखीचा त्रास उद्भवत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.



संधिवात असलेल्या रुग्णांसाठी हा काळ अतिशय अवघड असतो. त्याचप्रमाणे यंदा सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. यामुळे अनेकांना सांधेदुखीचा त्रासही सुरू झाला आहे. गुडघे व सांध्यांच्या दुखण्याने हैराण झालेले अनेक रुग्ण सध्या उपचारासाठी रुग्णालयात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



थंडी वाढल्याने विशेषतः वातरक्त आणि आमवात यांसारखे आजार आहेत. त्यांना थंडीत खूपच त्रास होतो. ज्यामुळे वेदना, सूज, जळजळ आणि सांधे कडक होणे अशा समस्या उद्भवतात. थंडीमध्ये सतत मांसाहार किंवा अधिकाधिक गोड पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तवात होण्याची शक्यता असते. युरिक अॅसिडमध्ये खर (क्रिस्टल) तयार होतात. ही खर रक्तात विशेषकरून जेथे हाडांचे जॉईंट्स असतात तेथे अडकते आणि वेदना सुरू होतात.



यावेळी डॉ. अभय गायकवाड म्हणाले यांनी, थंडी सुरू झाल्यापासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हिवाळ्यात सांधेदुखीचा धोका अधिक असल्याचे म्हटले आहे.

Comments
Add Comment

Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक

झिशान सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन सोडले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून

MHADA Lottery : आता सर्वसामान्यांना घर खरेदी करता येणार, म्हाडाच्या ६२४८ घरांच्या किमतीत कपात...

मुंबई : MHADA house prices reduced सर्वसामान्यांना हक्काचं घर खरेदी करण्यासाठी म्हाडाकडून अल्पदरात (MHADA Price)  घरांची सोडत काढण्यात

कोकण किनारपट्टीला ३.५ ते ४.५ मीटर उंच लाटांचा इशारा

मुंबई : रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर

BMC : प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार, इमारतीचा ५० टक्के भाग खुला, मनपाचे नवीन धोरण

मुंबई :  महानगरपालिका शहराच्या विकासासाठी नवीन धोरण तयार करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलणार असून शहरातील

व्यायाम केल्यानंतर ही चूक कधीही करू नका ...

मुंबई : फिटनेस जपण्यासाठी चालणे, धावणे, जिम करणे या पद्धतीने घाम गाळण्यावर हल्ली अनेकांचा भर असतो. व्यायाम केला की