थंडीमुळे अनेकजण सांधेदुखीच्या त्रासाने हैराण

  148

ठाणे (वार्ताहर) : हिवाळ्यातील थंडी प्रत्येकाला हवीहवीशी वाटत असली तरी काही जणांसाठी हवेतील हा गारवा वेदनादायी ठरत आहे. कारण, हिवाळ्यात थंडीमुळे अनेक लोकांना सांधेदुखीचा त्रास उद्भवत असल्याची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी दिली आहे.



संधिवात असलेल्या रुग्णांसाठी हा काळ अतिशय अवघड असतो. त्याचप्रमाणे यंदा सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. यामुळे अनेकांना सांधेदुखीचा त्रासही सुरू झाला आहे. गुडघे व सांध्यांच्या दुखण्याने हैराण झालेले अनेक रुग्ण सध्या उपचारासाठी रुग्णालयात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



थंडी वाढल्याने विशेषतः वातरक्त आणि आमवात यांसारखे आजार आहेत. त्यांना थंडीत खूपच त्रास होतो. ज्यामुळे वेदना, सूज, जळजळ आणि सांधे कडक होणे अशा समस्या उद्भवतात. थंडीमध्ये सतत मांसाहार किंवा अधिकाधिक गोड पदार्थ खाल्ल्यामुळे रक्तवात होण्याची शक्यता असते. युरिक अॅसिडमध्ये खर (क्रिस्टल) तयार होतात. ही खर रक्तात विशेषकरून जेथे हाडांचे जॉईंट्स असतात तेथे अडकते आणि वेदना सुरू होतात.



यावेळी डॉ. अभय गायकवाड म्हणाले यांनी, थंडी सुरू झाल्यापासून रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हिवाळ्यात सांधेदुखीचा धोका अधिक असल्याचे म्हटले आहे.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही