‘आदित्य ठाकरेंना मिळालेल्या धमकीची एसआयटी करणार चौकशी’

  82

मुंबई  : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मिळालेल्या व्हॉट्स अॅपवरील धमकीची तसेच लोकप्रतिनिधी वा मंत्र्यांना मिळणाऱ्या अशा स्वरूपाच्या धमक्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरूवारी विधानसभेत केली.



शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हॉट्स अॅपवर मिळालेल्या धमकीचा विषय उपस्थित केला. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी एसआयटी नेमून तपास करण्याची मागणी केली. अशा धमक्यांमागे सनातन संस्थासारख्या संस्था आहेत, असा आरोपही त्यांनी केला.



विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना मिळालेल्या धमकीचा निषेध केला. सनातन संस्थेबद्दल इतका त्रास असेल तर दोन वर्षे सत्तेत आहात, का बंदी घातली नाही? असा सवाल त्यांनी केला. या संस्थेविरूद्ध कोणतेही पुरावे आढललेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.



सुधीर मुनगंटीवार यांनी यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना मिळालेल्या धमकीची आठवण करून दिली. या प्रकरणी अजूनही कोणाला अटक झालेली आहे. आपण पोलिसांवर १५ हजार कोटी खर्च करतो. आरोपी सापडत नाहीत. मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडतात. कोणी ठेवल्या हे कळत नाही. काय चालले आहे हे? असा सवाल त्यांनी केला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अशा कितीतरी जणांना धमक्या मिळाल्या आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी आमदारांची एक समिती स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसचे नाना पटोले यांनीही ही गंभीर बाब असून यावर कडक उपाययोजना करण्याची मागणी केली.



गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्याला उत्तर दिले. या व अशा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. या प्रकरणी बेंगळुरूमधून जयसिंग रजपूत नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई