‘आदित्य ठाकरेंना मिळालेल्या धमकीची एसआयटी करणार चौकशी’

मुंबई  : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मिळालेल्या व्हॉट्स अॅपवरील धमकीची तसेच लोकप्रतिनिधी वा मंत्र्यांना मिळणाऱ्या अशा स्वरूपाच्या धमक्यांची एसआयटीमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरूवारी विधानसभेत केली.



शिवसेनेचे सुनील प्रभू यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हॉट्स अॅपवर मिळालेल्या धमकीचा विषय उपस्थित केला. अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी एसआयटी नेमून तपास करण्याची मागणी केली. अशा धमक्यांमागे सनातन संस्थासारख्या संस्था आहेत, असा आरोपही त्यांनी केला.



विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांना मिळालेल्या धमकीचा निषेध केला. सनातन संस्थेबद्दल इतका त्रास असेल तर दोन वर्षे सत्तेत आहात, का बंदी घातली नाही? असा सवाल त्यांनी केला. या संस्थेविरूद्ध कोणतेही पुरावे आढललेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.



सुधीर मुनगंटीवार यांनी यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांना मिळालेल्या धमकीची आठवण करून दिली. या प्रकरणी अजूनही कोणाला अटक झालेली आहे. आपण पोलिसांवर १५ हजार कोटी खर्च करतो. आरोपी सापडत नाहीत. मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडतात. कोणी ठेवल्या हे कळत नाही. काय चालले आहे हे? असा सवाल त्यांनी केला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, अशा कितीतरी जणांना धमक्या मिळाल्या आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी आमदारांची एक समिती स्थापन करावी, अशी मागणी त्यांनी केली. काँग्रेसचे नाना पटोले यांनीही ही गंभीर बाब असून यावर कडक उपाययोजना करण्याची मागणी केली.



गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्याला उत्तर दिले. या व अशा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. या प्रकरणी बेंगळुरूमधून जयसिंग रजपूत नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमध्ये वर्षातून दोनदा भरवा विज्ञान प्रदर्शन

मुंबई : विद्यार्थ्यांमधील चिकित्सक वृत्तीला वाव देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेले ‘विज्ञान

मुंबईतील फेरीवाला माफियाराज कायमचेच उखडून टाका

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील वाढत्या फेरीवाल्यांवरील कारवाई सध्या प्रशासनाने कडक केली असली तरी या

तुमच्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात आम्ही एक्सपर्ट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे सर्व पक्षांच्या नगरसेवकांना सोबत घेवून चांगल्याप्रकारे कामकाज क

शाळा दत्तक धोरण रद्द करण्याची काँग्रेस आमदार पुत्राची मागणी नामंजूर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने खासगी संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महापालिकेच्या दिलेल्या दत्तक

मासिक पाळी दरम्यान रजा योग्य की अयोग्य?

राज्य महिला आयोगाच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून मासिक पाळी दरम्यान

कनिष्ठ अभियंता संवर्गातील भरतीबाबत न्यायालयात सक्षम बाजू मांडा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या नगर अभियंता विभाग अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/यांत्रिकी व