नवी दिल्ली: आयपीएलच्या आगामी हंगामाचा ( २०२२) मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी सर्व फ्रँचायझींना याबाबत माहिती दिली. लखनौ आणि अहमदाबाद हे आणखी दोन संघ सामील झाल्यामुळे पुढील लिलावामध्ये १० संघ सहभागी होतील. अनेक प्रमुख क्रिकेटपटू थेट लिलावात असल्याने मोठी बोली लावली जाऊ शकते.
दरम्यान, लखनौ आणि अहमदाबाद फ्रँचायझींसाठी १ डिसेंबरपासून रिटेन्शन विंडो सुरू झाली आहे. लिलावापूर्वी प्रत्येकी ३३ कोटी रुपये खर्च करून दोन्ही संघ प्रत्येकी ३ खेळाडूंना कायम (रिटेन) ठेवू शकतात. या खेळाडूंसाठी अनुक्रमे १५ कोटी, ११ कोटी आणि ७ कोटींचे शुल्क आकारू शकतात. तसेच, तीन खेळाडूंपैकी दोन भारतीय असणे आवश्यक आहे.
आयपीएल २०२२चा हंगाम २ एप्रिलपासून सुरू होऊ शकतो. पहिला सामना चेन्नईत होणार आहे. यावेळी सामन्यांची संख्या वाढल्यामुळे आयपीएलचा एकूण कालावधी ६० दिवसांहून अधिक वाढू शकतो. ४ किंवा ५ जूनला अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो. मात्र, सर्व संघांना पूर्वीप्रमाणे प्रत्येकी १४ सामने खेळावे लागणार आहेत. सात सामने घरच्या मैदानावर तर तितकेच सामने ‘अवे’ खेळवले जातील.
आयपीएल २०२०चा संपूर्ण हंगाम, तर आयपीएल २०२१चा अर्धा हंगाम यूएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र बोर्डाचे सचिव जय शहा यांनी सध्याचा हंगाम देशातच होणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…