आयपीएलचा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारीला

नवी दिल्ली: आयपीएलच्या आगामी हंगामाचा ( २०२२) मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. आयपीएलच्या अधिकाऱ्यांनी सर्व फ्रँचायझींना याबाबत माहिती दिली. लखनौ आणि अहमदाबाद हे आणखी दोन संघ सामील झाल्यामुळे पुढील लिलावामध्ये १० संघ सहभागी होतील. अनेक प्रमुख क्रिकेटपटू थेट लिलावात असल्याने मोठी बोली लावली जाऊ शकते.



दरम्यान, लखनौ आणि अहमदाबाद फ्रँचायझींसाठी १ डिसेंबरपासून रिटेन्शन विंडो सुरू झाली आहे. लिलावापूर्वी प्रत्येकी ३३ कोटी रुपये खर्च करून दोन्ही संघ प्रत्येकी ३ खेळाडूंना कायम (रिटेन) ठेवू शकतात. या खेळाडूंसाठी अनुक्रमे १५ कोटी, ११ कोटी आणि ७ कोटींचे शुल्क आकारू शकतात. तसेच, तीन खेळाडूंपैकी दोन भारतीय असणे आवश्यक आहे.



आयपीएल २०२२चा हंगाम २ एप्रिलपासून सुरू होऊ शकतो. पहिला सामना चेन्नईत होणार आहे. यावेळी सामन्यांची संख्या वाढल्यामुळे आयपीएलचा एकूण कालावधी ६० दिवसांहून अधिक वाढू शकतो. ४ किंवा ५ जूनला अंतिम सामना खेळवला जाऊ शकतो. मात्र, सर्व संघांना पूर्वीप्रमाणे प्रत्येकी १४ सामने खेळावे लागणार आहेत. सात सामने घरच्या मैदानावर तर तितकेच सामने ‘अवे’ खेळवले जातील.
आयपीएल २०२०चा संपूर्ण हंगाम, तर आयपीएल २०२१चा अर्धा हंगाम यूएईमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र बोर्डाचे सचिव जय शहा यांनी सध्याचा हंगाम देशातच होणार असल्याचे आधीच स्पष्ट केले होते.

Comments
Add Comment

Madhya Pradesh : भयंकर! कफ सिरप दुर्घटनेनंतर मध्य प्रदेशातील रुग्णालयात औषधात आढळल्या 'अळ्या'

ग्वाल्हेरच्या सरकारी रुग्णालयातील औषधांचा साठा सील मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात 'टॉक्सिक कफ सिरप'मुळे (Toxic Cough Syrup)

Deepika Padukone : दीपिकाची AI मध्ये 'व्हॉइस' एन्ट्री! 'Chat Soon' म्हणत अभिनेत्रीने मिळवला जागतिक प्लॅटफॉर्मवर खास स्थान

सहा देशांसाठी दीपिका पदुकोण बनली इंग्रजी व्हॉइस बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) हिने

पंतप्रधान मोदी १३ हजार ४३० कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते १३ हजार ४३० कोटी

'मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादापासून मुक्त होईल', गृहमंत्री अमित शहांचा विश्वास

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशातून नक्षलवाद संपवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांबद्दल

दिल्लीत पर्यावरणपूरक फटाके फोडण्यास मर्यादित परवानगी

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने आज दिल्ली-एनसीआर (राष्ट्रीय राजधानी क्षेत्र) मध्ये १८ ते २१ ऑक्टोबर २०२५

महिलांच्या अपहरणामध्ये पश्चिम बंगाल देशात आघाडीवर, महाराष्ट्र कितव्या स्थानावर? धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली: देशभरात अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असून, विशेषतः महिलांच्या अपहरणाच्या प्रकरणांमध्ये चिंताजनक