लग्नातील दागिने चोरीप्रकरणी ३ अटकेत

  81

इगतपुरी: मुंबईतील लग्नांमध्ये दागिन्यांची चोरी करणाऱ्या तीन आरोपींना इगतपुरी पोलिसांनी अटक केली असून अन्य एक आरोपी फरार झाला आहे. मुंबईतील केपटाऊन व्हिलाज येथे ७ डिसेंबरला लग्न सोहळा सुरू असताना नवरीचे दागिने असलेली बॅग काही अज्ञात चोरांनी लंपास केल्याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. याबाबत ताराचंद केवलचंद बबेरवाल (रा. घोटी) यांनी फिर्याद दाखल केली होती.

इगतपुरीचे पोलीस निरीक्षक वसंत पथवे व पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांनी तातडीने शोध पथक नेमून महाराष्ट्र पोलीस व्हॉटस ॲप ग्रुपच्या आधारे चोरांचा शोध सुरू केला. परिसरातील फोटो शुटींगच्या आधारे तपास सुरू केला असता आरोपी व त्यांचे मोबाईल नंबर मिळविण्यात आले. तपासाची चक्र वेगाने फिरवत असताना संबंधित आरोपी मुंबई जवळच्या मिरा - भाईंदर परीसरात असल्याचे मोबाईल लोकेशन आढळले. त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजाराम दिवटे यांनी काशिमीरा पोलीसांची या तपासकामी मदत घेत घटनेतील आरोपींना केवळ ४८ तासांत ताब्यात घेतले. तीन आरोपी हाती लागले असून त्यापैकी अन्य एकाने पळ काढला. तिघा आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. पोलीसांनी आरोपीना इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना २४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वसंत पथवे यांनी दिली.

सुमारे ६ लाख ११ हजार रूपये किंमतीचे चोरी झालेल्या दागिन्यांपैकी पैकी ५ लाख ६० हजार रूपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडे सापडला. या घटनेतील आरोपी अतिश अमर सिसोदिया, (२० , रा. जिल्हा राजगड, मध्यप्रदेश), निखिल रवी सिसोदिया, (१९ रा. पिपलीया, मध्यप्रदेश), करण महावीर सिंग, (२३ , रा. जिल्हा आग्रा, उत्तरप्रदेश) तर चौथा आरोपी विकास सालकराम सिसोदिया हा फरार असून पोलीस शोध घेत आहे. इगतपुरी पोलीसांनी केवळ महाराष्ट्र पोलीस व्हॉटस ॲप ग्रुपच्या आधारे अट्टल गुन्हेगारांचा शोध ४८ तासांत लावल्याने इगतपुरी पोलीसांचे अभिनंदन होत आहे.
Comments
Add Comment

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

कुर्ला ते छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा प्रवास आता  वेगाने होणार...

मुंबई : मुंबईकरांची  वाहतूक कोंडी (TRAFFIC CONGESTION) सोडवण्यासाठी "एमएमआरडीए"ने नवीन प्रकल्प उभारण्याचं काम सुरु केले आहे. 

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून

जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, परराष्ट्र मंत्र्यांकडे आ. निलेश राणे यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच