२००पेक्षा अधिक लोकांसाठी परवानगी सक्तीची

मुंबई (प्रतिनिधी) : नवीन वर्षाचे स्वागत आणि ख्रिसमस निमित्त मुंबईत मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन केले जाते. दरम्यान ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार पार्ट्या, लग्न, समारंभात २००पेक्षा जास्त लोक असल्यास मनपा सहाय्यक आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे.


मुंबईत सध्या ओमायक्रॉनचे रुग्ण सापडत असून भीती वाढत आहे. त्यातच आता ख्रिसमस शनिवारपासून सुरू होत असून नववर्षाचे स्वागतही मुंबईत उत्साहात केले जाते. नवीन वर्षाचे स्वागत आणि ख्रिसमसनिमित्त मुंबईत पार्ट्यांचे आयोजन केले जाते. मात्र या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी सुधारित नियमावली जाहीर केली असून त्यानुसार खुल्या जागेत किंवा सभागृहात २००पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार असतील, तर संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची लेखी परवानगी बंधनकारक असणार आहे. उपस्थितांमधील दोन व्यक्तींमध्ये ६ फुटांचे अंतर असावे, अशी अटदेखील लागू केली आहे.


दरम्यान हे नियम लग्न, पार्टी, समारंभ, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक सभारंभ, कार्यक्रम यासाठी असतील. आयोजकांना मात्र हे नियम बंधनकारक आहेत. तसेच पालिकेच्या फिरत्या पथकांकडून अचानक अशा ठिकाणी धाडी टाकण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.



दोन व्यक्तींमध्ये ६ फुटांचे अंतर असावे


खुल्या जागेत किंवा सभागृहात २००पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार असतील, तर संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची लेखी परवानगी बंधनकारक असणार आहे. उपस्थितांमधील दोन व्यक्तींमध्ये ६ फुटांचे अंतर असावे, अशी अटदेखील लागू केली आहे. हे नियम लग्न, पार्टी, समारंभ, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक सभारंभ, कार्यक्रम यासाठी असतील.

Comments
Add Comment

एसटी चालकांच्या मद्यपानाविरुद्ध कडक पावले; मुख्यालयाकडून कठोर निर्देश

मुंबई :  २५ जानेवारी रोजी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अचानकपणे परळ

वरळी कोस्टल रोडवर उभारणार मुंबईतील तिसरा हेलिपॅड; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : वरळीत मुंबईच्या कोस्टल रोडवर लवकरच हेलिपॅडची सुविधा उभारण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर लँडिंगसाठी राजभवन,

Republic Day 2026 : प्रजासत्ताक दिन संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथ देशात सर्वोत्कृष्ट

नवी दिल्ली, २९ : देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर पार पडलेल्या दिमाखदार

Ajit Pawar : सोशल मिडियावरून पुन्हा व्हायरल होतोय अजितदादांचा मिश्किल, विनोदी अंदाज

महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धडाडीच्या आणि शिस्तप्रिय पर्वाचा आज बारामतीच्या मातीत शेवट झाला. राज्याचे

अजित पवारांच्या पश्चात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे? राजकीय वर्तुळाच्या नजरा मुख्यमंत्र्यांकडे

२३ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या

Ajit Pawar Funeral : गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून दादांना अखेरचा निरोप

गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना अखेरचा