२००पेक्षा अधिक लोकांसाठी परवानगी सक्तीची

  197

मुंबई (प्रतिनिधी) : नवीन वर्षाचे स्वागत आणि ख्रिसमस निमित्त मुंबईत मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन केले जाते. दरम्यान ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार पार्ट्या, लग्न, समारंभात २००पेक्षा जास्त लोक असल्यास मनपा सहाय्यक आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे.


मुंबईत सध्या ओमायक्रॉनचे रुग्ण सापडत असून भीती वाढत आहे. त्यातच आता ख्रिसमस शनिवारपासून सुरू होत असून नववर्षाचे स्वागतही मुंबईत उत्साहात केले जाते. नवीन वर्षाचे स्वागत आणि ख्रिसमसनिमित्त मुंबईत पार्ट्यांचे आयोजन केले जाते. मात्र या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी सुधारित नियमावली जाहीर केली असून त्यानुसार खुल्या जागेत किंवा सभागृहात २००पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार असतील, तर संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची लेखी परवानगी बंधनकारक असणार आहे. उपस्थितांमधील दोन व्यक्तींमध्ये ६ फुटांचे अंतर असावे, अशी अटदेखील लागू केली आहे.


दरम्यान हे नियम लग्न, पार्टी, समारंभ, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक सभारंभ, कार्यक्रम यासाठी असतील. आयोजकांना मात्र हे नियम बंधनकारक आहेत. तसेच पालिकेच्या फिरत्या पथकांकडून अचानक अशा ठिकाणी धाडी टाकण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.



दोन व्यक्तींमध्ये ६ फुटांचे अंतर असावे


खुल्या जागेत किंवा सभागृहात २००पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार असतील, तर संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची लेखी परवानगी बंधनकारक असणार आहे. उपस्थितांमधील दोन व्यक्तींमध्ये ६ फुटांचे अंतर असावे, अशी अटदेखील लागू केली आहे. हे नियम लग्न, पार्टी, समारंभ, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक सभारंभ, कार्यक्रम यासाठी असतील.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.