२००पेक्षा अधिक लोकांसाठी परवानगी सक्तीची

मुंबई (प्रतिनिधी) : नवीन वर्षाचे स्वागत आणि ख्रिसमस निमित्त मुंबईत मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन केले जाते. दरम्यान ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सुधारित नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार पार्ट्या, लग्न, समारंभात २००पेक्षा जास्त लोक असल्यास मनपा सहाय्यक आयुक्तांची परवानगी घ्यावी लागणार आहे.


मुंबईत सध्या ओमायक्रॉनचे रुग्ण सापडत असून भीती वाढत आहे. त्यातच आता ख्रिसमस शनिवारपासून सुरू होत असून नववर्षाचे स्वागतही मुंबईत उत्साहात केले जाते. नवीन वर्षाचे स्वागत आणि ख्रिसमसनिमित्त मुंबईत पार्ट्यांचे आयोजन केले जाते. मात्र या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी सुधारित नियमावली जाहीर केली असून त्यानुसार खुल्या जागेत किंवा सभागृहात २००पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार असतील, तर संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची लेखी परवानगी बंधनकारक असणार आहे. उपस्थितांमधील दोन व्यक्तींमध्ये ६ फुटांचे अंतर असावे, अशी अटदेखील लागू केली आहे.


दरम्यान हे नियम लग्न, पार्टी, समारंभ, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक सभारंभ, कार्यक्रम यासाठी असतील. आयोजकांना मात्र हे नियम बंधनकारक आहेत. तसेच पालिकेच्या फिरत्या पथकांकडून अचानक अशा ठिकाणी धाडी टाकण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे.



दोन व्यक्तींमध्ये ६ फुटांचे अंतर असावे


खुल्या जागेत किंवा सभागृहात २००पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार असतील, तर संबंधित विभागाच्या सहाय्यक आयुक्तांची लेखी परवानगी बंधनकारक असणार आहे. उपस्थितांमधील दोन व्यक्तींमध्ये ६ फुटांचे अंतर असावे, अशी अटदेखील लागू केली आहे. हे नियम लग्न, पार्टी, समारंभ, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक सभारंभ, कार्यक्रम यासाठी असतील.

Comments
Add Comment

मुंबईतील दहिसर पूर्व येथे इमारतीत भीषण आग : वृद्ध महिलेचा मृत्यू , अनेक जखमी

मुंबई : दहिसर पूर्व येथील जनकल्याण एस.आर.ए. इमारतीच्या सातव्या मजल्यावर अचानक भीषण आग लागल्याने परिसरात खळबळ

लालबागच्या राजाच्या विसर्जनाला का होतोय उशीर ?

मुंबई : सेलिब्रेटी, खेळाडू, राजकारणी यांच्यासह लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन

मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, विजेचा धक्का लागून ५ जण गंभीररित्या भाजले; एकाचा मृत्यू

मुंबई: मुंबईत गणपती विसर्जनादरम्यान एक दुःखद घटना घडली आहे. साकीनाका येथील खैराणी रोडवरील एस.जे. स्टुडिओजवळ

Lalbaug visarjan 2025: मुंबईच्या एकतेचे दर्शन: लालबागचा राजा आणि भायखळ्याची हिंदुस्तानी मशीद Video पहाच..

मुंबई: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या गणरायाला निरोप देताना, मुंबईतील गणेश विसर्जन सोहळ्यात एक अनोखे आणि

मुंबई पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणारा 'बिहारी' नोएडात सापडला

मुंबई : अनंत चतुर्दशीच्या उत्सवाच्या एक दिवस आधी मुंबईच्या वाहतूक पोलिसांना धमकीचा संदेश पाठवणाऱ्या एका

महाराष्ट्रात गणेश विसर्जन उत्साहात

मुंबई : गिरगाव चौपाटीवर गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुका वाजत गाजत आणि गणपती बाप्पाच्या जयघोषात सुरू आहेत.