विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन गदारोळ!

मुंबई : विधानसभा अध्यक्षांची निवड आता आवाजी मतदानाने होणार आहे. आज राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष निवडणूक संदर्भातील नियम समितीचा अंतरिम अहवाल सभागृहात मांडण्यात आला. माजी मुख्यमंत्री आणि आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी हा अहवाल सभागृहात मांडला. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, जर आपल्याकडे आपण म्हणताय की बहुमताचा आकडा मोठा आहे तर एवढी भिती का आहे. केवळ एक दिवसाचा कालावधी का देण्यात आला. कालावधी कमी करण्याचा नियम आपल्याला बदलता येणार नाही, असे फडणवीस म्हणाले. त्यांनी म्हटले की, जर रेटून नेणार असाल तर आम्ही कायदेशीर लढाई करणार आहोत. आपल्या आमदारांवर एवढा अविश्वास का आहे, असेही ते म्हणाले.


यावर आमदार नाना पटोले म्हणाले की, घोडेबाजार बंद व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे. आपण पहिल्यांदा आपण नियम बदलत आहोत का? या नियम बदलाला आमचा पाठिंबा आहे, असे पटोले म्हणाले.


यावर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपली बाजून मांडताना बेईमानी हा शब्द वापरला. त्यावर सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. यावर मुनगंटीवार म्हणाले की, बेइमानी हा शब्द का मागे घ्यायचा? त्यांनी घोडेबाजार हा शब्द वापरला. सर्व सदस्यांचा त्यांनी अवमान केला. हा काय घोड्यांचा तबेला आहे का? नानाभाऊ दहा वर्षे भाजपमध्ये राहिलात एवढे संस्कार केले ते तर दाखवा, असे मुनगंटीवार म्हणाले.


नवाब मलिक यावेळी म्हणाले की, क्रॉस वोटिंग होऊ नये म्हणून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी असा निर्णय घेतला होता. किमान त्यांच्या निर्णयाचा तर आदर करा. मग सर्वांनी आता हरकत घेऊ नका आणि एकमताने मंजूर करा, असे मलिक म्हणाले.


यावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, अटलबिहारी वाजपेयी यांनी अध्यक्ष निवडणुकीला व्हीप जारी करण्याचा निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे सरकार १० दिवसांचा कालावधी एक दिवसावर का आणत आहे. सरकार भीतीपोटी हे सर्व करत आहे, असे फडणवीस म्हणाले. विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रिया संदर्भात आम्हांला हा निर्णय मान्य नाही, त्यामुळे आम्ही सभात्याग करत आहोत. यानंतर विरोधी पक्षाने सभात्याग केला.

Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण