मुंबई : आगामी वर्षात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकताच औरंगाबाद, नाशिक आणि पुण्याचा दौरा केला. या दौऱ्यावरुन मुंबईत परतल्यानंतर राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज ठाकरे यांनी मंगळवारी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना शिवतीर्थावर बोलावले आहे. याठिकाणी राज ठाकरे त्यांच्याशी संवाद साधतील. यावेळी आगामी महानगरपालिका निवडणुकांची रणनीती आखली जाईल.
राज ठाकरे यांनी नुकत्याच झालेल्या औरंगाबाद, नाशिक आणि पुणे दौऱ्यात स्थानिक कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्यातील राजकीय अंदाज घेतल्यानंतर आता राज ठाकरे स्वत: पालिका निवडणुकांसाठी रणनीती आखण्याची शक्यता आहे.
रुपाली पाटील यांनी मनसेचा राजीनामा दिल्याने राज ठाकरे यांचा पुणे दौरा चांगलाच गाजला होता. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे यांनी पुण्यातील मनसेच्या कोअर कमिटीला बैठकीसाठी बोलावले आहे. रुपाली पाटील यांनी पक्ष सोडताना कोअर कमिटीतील नेत्यांविषयी नाराजी व्यक्त केली होती. रुपाली पाटील यांची पुण्यातील लोकप्रियता पाहता त्यांचा राजीनामा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका निवडणुकीत मनसेच्या स्थानिक नेतृत्वाला आणखी बळकट होण्याची गरज आहेत. त्यादृष्टीने आजच्या बैठकीत राज ठाकरे पुण्यातील पदाधिकाऱ्यांशी काय चर्चा करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. रुपाली पाटील यांच्या तक्रारीची दखल घेऊन पुण्यातील संघटनेत काही बदल होणार का, हेदेखील पाहावे लागेल.
तर दुसरीकडे ठाणे आणि नाशिकमध्येही मनसेकडून आगामी निवडणुकांमध्ये मोठा जोर लावला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच ठाण्यात अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसेने विराट मोर्चा काढला होता. ठाणे आणि नाशिकमध्ये मनसेची राजकीय ताकद मोठी आहे. त्यामुळे राज ठाकरे येथील पदाधिकाऱ्यांना काय आदेश देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…