हिमाचल प्रदेश, तामिळनाडू उपांत्य फेरीत

जयपूर :हिमाचल प्रदेश, तामिळनाडूने विजय हजारे वनडे चषक स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. मंगळवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत हिमाचल प्रदेशने उत्तर प्रदेशवर ५ विकेट आणि २७ चेंडू राखून मात केली. दुसऱ्या लढतीत तामिळनाडूने कर्नाटकवर १५१ धावांनी मोठा विजय मिळवला.

क्वार्टर फायनलमधील पहिल्या सामन्यात उत्तर प्रदेशचे २०७ धावांचे आव्हान हिमाचल प्रदेशने ५ विकेटच्या बदल्यात ४५.३ षटकांत पार केले. सलामीवीर प्रशांत चोप्रासह (९९ धावा) आणि वनडाऊन निखिल गंगटाने (५८ धावा) त्यांच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यापूर्वी, विनय गेलेतिया (३ विकेट) तसेच सिद्धार्थ शर्मा आणि पंकज जस्वालच्या (प्रत्येकी २ विकेट) अचूक माऱ्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना ५० षटकांत ९ बाद २०७ धावांमध्ये रोखण्यात हिमाचल प्रदेशला यश आले. उत्तर प्रदेशच्या तीन फलंदाजांना दोन आकडी धावा करता आल्या. त्यात रिंकू सिंगने सर्वाधिक ७६ धावा केल्या.

दुसऱ्या सामन्यात तामिळनाडूचे ३५५ धावांचे मोठे आव्हान कर्नाटकला पेलवले नाही. त्यांचा डाव ३९ षटकांत २०३ धावांमध्ये आटोपला. सलामीवीर नारायण जगदीशनसह (१०२ धावा) तिसऱ्या क्रमांकावरील आर. साई किशोर (९९ धावा) तसेच तळातील शाहरूख खान (नाबाद ७९ धावा) तसेच रघुपती सिलांबरसन (४ विकेट) आणि वॉशिंग्टन सुंदर (३ विकेट) विजयाचे शिल्पकार ठरले. कर्नाटकच्या प्रमुख फलंदाजांनी निराशा केली. सहा बॅटर्सनी दोन आकडी धावा केल्या तरी सर्वाधिक ४३ धावा श्रीनिवास शरथच्या आहेत. सलामीवीर देवदत्त पडिक्कल (०) आणि कर्णधार मनीष पांडेचे (९ धावा) अपयश कनार्टकला भोवले.

त्यापूर्वी, आघाडी फळी बहरल्याने तामिळनाडूने साडेतीनशेपार मजल मारली. त्यात ओपनर जगदीशनच्या १०१ चेंडूंतील १०२ धावांच्या खेळीचा समावेश आहे. त्याला साई किशोर आणि दिनेश कार्तिकची चांगली साथ लाभली. किशोरने ६१ तसेच कार्तिकने ४४ धावा केल्या. या त्रिकुटाने रचलेल्या मजबूत पायावर सातव्या क्रमांकावरील शाहरूख खानने कळस चढवला. त्याने अवघ्या ३९ चेंडूंत नाबाद ७९ धावा फटकावल्या. त्यात ७ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे.

विदर्भची बुधवारी लढत

उपांत्यपूर्व फेरीच्या उर्वरित दोन लढतींमध्ये पहिल्या सामन्यात बुधवारी विदर्भची गाठ सौराष्ट्राशी आहे. अन्य लढतीत केरळ आणि सर्व्हिसेस आमनेसामने आहेत.
Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या