भिवंडी :भिवंडी शहर म्हटले की कापड उद्योगनगरी डोळ्यासमोर येते. भिवंडीला देशाचे मँचेस्टर शहर म्हणून ओळखले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून भिवंडी शहरातील कापड उद्योगाला आलेल्या मंदीने कापड उद्योग भिवंडी शहरातून हद्दपार होण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
भिवंडी शहराची ओळख कापड उद्योग नगरी म्हणून संपूर्ण जगभरात आहे. भिवंडी शहरात तयार झालेले कापड विविध मोठमोठ्या ब्रँडच्या नावे विक्री केला जातो. मोठ्या प्रमाणात कापड तयार होत असल्याने भिवंडी शहरात मोठमोठी गोदामे आहेत. यामध्ये नावाजलेल्या कंपन्यांची गोदामे आहेत. मग या ठिकाणाहून कापड देशातील व राज्यातील विविध शहरांमध्ये पोहचवले जातात. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून भिवंडी कापड उद्योगाला मंदी आल्याने कापड व्यापारी आता कापड उद्योग सोडून इतर व्यवसायांमध्ये आपली नवीन सुरुवात करत असल्याचे समजते. हे असेच सुरू राहिले तर भिवंडीची कापड नगरी ही ओळख यामुळे पुसली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने पुढाकार घेऊन भिवंडीच्या कापड उद्योग नगरीला वाचविले पाहिजे, असे येथील उद्योजक आणि कामगारांचे म्हणणे आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…