भिवंडीतील कापड उद्योग हद्दपार होण्याच्या मार्गावर

मोनिश गायकवाड


भिवंडी :भिवंडी शहर म्हटले की कापड उद्योगनगरी डोळ्यासमोर येते. भिवंडीला देशाचे मँचेस्टर शहर म्हणून ओळखले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून भिवंडी शहरातील कापड उद्योगाला आलेल्या मंदीने कापड उद्योग भिवंडी शहरातून हद्दपार होण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

भिवंडी शहराची ओळख कापड उद्योग नगरी म्हणून संपूर्ण जगभरात आहे. भिवंडी शहरात तयार झालेले कापड विविध मोठमोठ्या ब्रँडच्या नावे विक्री केला जातो. मोठ्या प्रमाणात कापड तयार होत असल्याने भिवंडी शहरात मोठमोठी गोदामे आहेत. यामध्ये नावाजलेल्या कंपन्यांची गोदामे आहेत. मग या ठिकाणाहून कापड देशातील व राज्यातील विविध शहरांमध्ये पोहचवले जातात. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून भिवंडी कापड उद्योगाला मंदी आल्याने कापड व्यापारी आता कापड उद्योग सोडून इतर व्यवसायांमध्ये आपली नवीन सुरुवात करत असल्याचे समजते. हे असेच सुरू राहिले तर भिवंडीची कापड नगरी ही ओळख यामुळे पुसली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने पुढाकार घेऊन भिवंडीच्या कापड उद्योग नगरीला वाचविले पाहिजे, असे येथील उद्योजक आणि कामगारांचे म्हणणे आहे.
Comments
Add Comment

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगवान पोर्शे कार डिव्हायडरला धडकली, ड्रायव्हर गंभीर जखमी

मुंबई: मुंबईत बुधवारी रात्रीच्या सुमारास कारचा गंभीर अपघात घडला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वेगाने जाणारी

ब्रिटीश पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी यशराज स्टुडिओला दिली भेट

मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर सध्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. कीर स्टार्मर यांनी आज,

मुंबई शहर व उपनगरातील प्रस्तावित १० टक्के पाणीकपात रद्द

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील

तोतया ईडी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; आता ईडीच्या नोटीसवर क्यूआर कोड

मुंबई : कोणीही तोतय्या ईडी अधिकारी बनून लोकांची आर्थिक फसवणूक करू नये यासाठी ईडीकडून दिल्या जाणाऱ्या सिस्टम

पालिकेच्या २ हजार ७०० कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू होणार

मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनात ५ मे २००८ पूर्वी भरती झालेल्या २७०० कर्मचाऱ्यांचा जुन्या पेंशन योजनेत समावेश

बाणगंगा दीपोत्सवासाठी ४० लाखांचा खर्च! महापालिकेकडून २ कंत्राटदारांची नियुक्ती

मुंबई : बाणगंगा तलाव परिसरात त्रिपुरा पौर्णिमेला दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. कार्तिक महिन्यात