भिवंडीतील कापड उद्योग हद्दपार होण्याच्या मार्गावर

  160

मोनिश गायकवाड


भिवंडी :भिवंडी शहर म्हटले की कापड उद्योगनगरी डोळ्यासमोर येते. भिवंडीला देशाचे मँचेस्टर शहर म्हणून ओळखले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून भिवंडी शहरातील कापड उद्योगाला आलेल्या मंदीने कापड उद्योग भिवंडी शहरातून हद्दपार होण्याच्या मार्गावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

भिवंडी शहराची ओळख कापड उद्योग नगरी म्हणून संपूर्ण जगभरात आहे. भिवंडी शहरात तयार झालेले कापड विविध मोठमोठ्या ब्रँडच्या नावे विक्री केला जातो. मोठ्या प्रमाणात कापड तयार होत असल्याने भिवंडी शहरात मोठमोठी गोदामे आहेत. यामध्ये नावाजलेल्या कंपन्यांची गोदामे आहेत. मग या ठिकाणाहून कापड देशातील व राज्यातील विविध शहरांमध्ये पोहचवले जातात. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून भिवंडी कापड उद्योगाला मंदी आल्याने कापड व्यापारी आता कापड उद्योग सोडून इतर व्यवसायांमध्ये आपली नवीन सुरुवात करत असल्याचे समजते. हे असेच सुरू राहिले तर भिवंडीची कापड नगरी ही ओळख यामुळे पुसली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने पुढाकार घेऊन भिवंडीच्या कापड उद्योग नगरीला वाचविले पाहिजे, असे येथील उद्योजक आणि कामगारांचे म्हणणे आहे.
Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.