शिक्षकांनी स्वयं मूल्यांकन देखील करावे

  141

मुंबई : शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून अध्ययन केवळ विद्यार्थ्यांनीच करावे असे नसून शिक्षकांनी देखील सातत्याने अध्ययन करून अद्ययावत राहिले पाहिजे.  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी स्वयं मूल्यांकन देखील केले पाहिजे.  त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता विकास साधला जाईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी केले.  कांदिवली येथील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंगळवारी 'नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी राज्यपाल बोलत होते.



कार्यक्रमाला ठाकूर महाविद्यालयाचे सचिव जितेंद्र सिंह ठाकूर, कोषाध्यक्ष राजकुमार सिंह, विश्वस्त रमेश सिंह, प्राचार्या डॉ. चैताली चक्रवर्ती, उपप्राचार्य निशिकांत झा, विशेष निमंत्रक प्राचार्या डॉ. शोभना वासुदेवन व डॉ. ए एम पुराणिक तसेच प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण शिक्षणाशी निगडित सर्व गटांशी व्यापक विचार विमर्श करून तयार करण्यात आले असून या धोरणात विद्यार्थ्यांना सुरुवातीची काही वर्षे मातृभाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला आहे, असे सांगताना जपान किंवा चीन या देशात आरंभीचे शिक्षण मातृभाषेतच दिले जाते याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेचे अधिकारी कंटाळले प्रशासनाच्या कार्यपद्धतीला

रिक्त पदांअभावी अतिरिक्त कामांची जबाबदारी आणि चौकशीचा ससेमिरा मुंबई:मुंबई महापालिकेचा कारभारात आता

दादर स्थानक परिसरात पोलिसांना न जुमानता होतो व्यवसाय

पण गावातील महिलांना दिला जातो त्रास मुंबई :मुंबई महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमान सध्या दादरसह इतर

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित ठिकाणांना भेट देण्यासाठी विशेष ट्रेन

भारत गौरव ट्रेन टूरला १०० टक्के बुकिंगसह प्रचंड प्रतिसाद नवी दिल्ली :इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

ई-शिवनेरी बस सेवेला मुंबईकरांची कायम पसंती

महामंडळाच्या तिजोरीत जवळपास ५० कोटीं महसूल जमा मुंबई : ई-शिवनेरी मुंबईकरांची लाडकी बनली असून एसटीचा आधुनिक

समृद्धी महामार्गावरील वाहनांच्या संख्येत वाढ

मुंबई :नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी – आमणे हा शेवटचा टप्पा गुरुवारी सायंकाळी वाहतूक सेवेत दाखल

शालेय बस चालकांची दर आठवड्याला होणार मद्यपान चाचणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनाचा निर्णय मुंबई : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बस