१८५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

पालघर :पालघर जिल्ह्यातील मोखाडा, विक्रमगड व तलासरी या तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी २१ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. जिल्ह्यात आज थंडीचा कडाका असल्यामुळे सकाळच्या पहिल्या सत्रात मतदानाला वेग आला नव्हता. सकाळी अनेक मतदान केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळत होता. तथापि, दुपारनंतर मात्र मतदारांनी मतदान केंद्रांवर चांगलीच गर्दी केली होती. सर्वत्र रांगाच रांगा पाहायला मिळाल्या.



सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत तलासरीमध्ये ६५ टक्के, मोखाडामध्ये ७१.०५ टक्के व विक्रमगडमध्ये ६० टक्के असे मतदान झाले. या तिन्ही नगरपंचायतींच्या निवडणुकीत १८५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. या सर्व उमेदवारांना या निवडणुकीत ‘आपले काय होणार?’ हे १९ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी कळणार आहे. तोपर्यंत या उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आयोगाने न्यायालयाच्या निर्देशानुसार या निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे या सर्व उमेदवारांना किमान महिनाभर धाकधूक सहन करावी लागणार आहे.



मतदार कुणाला साथ देणार?



या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप), जिजाऊ संघटना व बहुजन विकास आघाडी (बविआ) या पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तलासरी येथे माकप, मोखाडा येथे शिवसेना व विक्रमगड येथे जिजाऊ यांचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. या सर्व राजकीय पक्षांनी प्रचारात विकासाच्या मुद्द्यावर एकमेकांना घेरले होते. पण मतदार कोणाला साथ देतात हे मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. त्यासाठी या तीन नगरपंचायतींच्या मतदारांना तब्बल एक महिना प्रतीक्षा करावी
लागणार आहे.

Comments
Add Comment

खोकल्याच्या सिरपमुळे बालकांचा मृत्यू; खबरदारीसाठी राज्याने 'हा' टोल-फ्री क्रमांक केला जारी!

मुंबई: मध्य प्रदेश आणि राजस्थानसह देशातील काही राज्यांमध्ये 'कोल्ड्रिफ' (Coldrif) नावाच्या खोकल्याच्या सिरपमुळे काही

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

रेल्वे , बेस्ट, एसटी , मेट्रो... आता एकाच कार्डवर फिरू मुंबई ...

मुंबई : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही एकाच प्लॅटफॉर्म आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न होते. त्याच

अंधेरी ते मालाड प्रवास सहा मिनिटांत करता येणार

मुंबई : पश्चिम उपनगरातील अंधेरी ते मालाड या पट्ट्यात प्रचंड लोकवस्ती आहे. मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय,

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात