१८५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद

Share

पालघर :पालघर जिल्ह्यातील मोखाडा, विक्रमगड व तलासरी या तीन नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी २१ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. जिल्ह्यात आज थंडीचा कडाका असल्यामुळे सकाळच्या पहिल्या सत्रात मतदानाला वेग आला नव्हता. सकाळी अनेक मतदान केंद्रांवर शुकशुकाट पाहायला मिळत होता. तथापि, दुपारनंतर मात्र मतदारांनी मतदान केंद्रांवर चांगलीच गर्दी केली होती. सर्वत्र रांगाच रांगा पाहायला मिळाल्या.

सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत तलासरीमध्ये ६५ टक्के, मोखाडामध्ये ७१.०५ टक्के व विक्रमगडमध्ये ६० टक्के असे मतदान झाले. या तिन्ही नगरपंचायतींच्या निवडणुकीत १८५ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झाले आहे. या सर्व उमेदवारांना या निवडणुकीत ‘आपले काय होणार?’ हे १९ जानेवारी २०२२ रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशी कळणार आहे. तोपर्यंत या उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावरून आयोगाने न्यायालयाच्या निर्देशानुसार या निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर टाकली आहे. त्यामुळे या सर्व उमेदवारांना किमान महिनाभर धाकधूक सहन करावी लागणार आहे.

मतदार कुणाला साथ देणार?

या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप), जिजाऊ संघटना व बहुजन विकास आघाडी (बविआ) या पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तलासरी येथे माकप, मोखाडा येथे शिवसेना व विक्रमगड येथे जिजाऊ यांचा वरचष्मा राहण्याची शक्यता आहे. या सर्व राजकीय पक्षांनी प्रचारात विकासाच्या मुद्द्यावर एकमेकांना घेरले होते. पण मतदार कोणाला साथ देतात हे मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. त्यासाठी या तीन नगरपंचायतींच्या मतदारांना तब्बल एक महिना प्रतीक्षा करावी
लागणार आहे.

Recent Posts

साहित्य म्हणजे नेमकं काय ?

गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…

10 minutes ago

शापित चित्रकेतू झाला वृत्रासूर

भालचंद्र ठोंबरे शुरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक चक्रवर्ती राजा होता. तो अतिशय धार्मिक, सुंदर, सर्वगुणसंपन्न…

25 minutes ago

प्रतिज्ञापत्रातील साक्षीदार

अ‍ॅड. रिया करंजकर कायदेशीर कामकाज करताना प्रत्येक वेळी स्टॅम्प पेपरची गरज भासते. हे स्टॅम्प पेपर…

35 minutes ago

गुणसुंदर…

पूनम राणे अधिकाराची खुर्ची आपल्याला ईश्वरी कृपेने मिळते. त्या खुर्चीला शोभा कशी आणायची, हे आपल्या…

55 minutes ago

मैत्र जीवांचे…

राजश्री वटे मानवी जीवनात महत्त्वाची भूमिका असते पुस्तकाची... म्हणतात ना “वाचाल तर वाचाल’’... लहानपणापासून ते…

1 hour ago

बर्फाचा चुरा दुधी का दिसतो?

प्रा. देवबा पाटील आनंदराव हे सेवानिवृत्त वैज्ञानिक असल्याने त्यांना विज्ञानाच्या सर्वच गोष्टी माहीत होत्या. ते…

1 hour ago