ऑफस्पिनर अश्विनचा गौप्यस्फोट

नवी दिल्ली: खराब फॉर्ममुळे २०१८ मध्ये निवृत्ती घेण्याचा विचार करत होता, असा गौप्यस्फोट भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने एका मुलाखतीदरम्यान केला आहे. कुणीही सहकारी मदतीला आले नसल्याची खंत त्याने यावेळी व्य्यक्त केली.
२०१८ ते २०२० या कालावधीत अनेक वेळा त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला. या सर्व काळात मी सतत चांगले करण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु गोष्टी कठीण होत होत्या. सहा चेंडू टाकल्यावर मला दम लागत होता, संपूर्ण शरीर थकले होते. गुडघेदुखी वाढली की मी लहान उडी मारून गोलंदाजी करायचो. सहकारी खेळाडू माझ्या दुखापतीबद्दल संवेदनशील नव्हते आणि कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. भारतीय संघातील अनेक खेळाडूंवर विश्वास व्यक्त करण्यात आला, मात्र असे घडले नाही. मी संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत, पण माझ्यावर विश्वास ठेवला गेला नाही, असे अश्विनने सांगितले.

अश्विन हा भारताच्या कसोटी संघातील महत्त्वाचा खेळाडू आहे. भारताचा मुख्य फिरकी गोलंदाज असण्यासोबतच अश्विनने अनेक वेळा बॅटनेही दमदार कामगिरी केली आहे आणि भारतासाठी सामने जिंकले आहेत. खराब फॉर्मवर मात करत त्याने टी-ट्वेन्टी वर्ल्डकप भारतीय संघातही स्थान मिळवले. सध्या तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. कसोटी मालिका खेळणार असला तरी वनडे मालिकेतही त्याचा संघात समावेश होऊ शकतो.


वडिलांचे म्हणणे खरे ठरले


२०१८ मध्ये मी पुन्हा दुखापतग्रस्त झालो, तेव्हा मी अनेकदा निवृत्ती घेण्याचा विचार केला. यावेळी मी केवळ पत्नीशीच बोलत असे. माझ्या वडिलांना विश्वास होता की एक दिवस त्यांचा मुलगा एकदिवसीय आणि टी-ट्वेन्टी संघात परत येईल आणि मृत्यूपूर्वी ते पाहू शकेल. त्याच्यासाठी ही खूप वैयक्तिक गोष्ट होती, असे अश्विनने म्हटले.
Comments
Add Comment

शुभमन गिल बाहेर; साई सुदर्शनला मिळणार कसोटीची संधी

गुवाहाटी : पहिल्या कसोटी दरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीनंतर शुभमन गिलची मैदानात पुनरागमन करण्याची शक्यता कमी

भारताचा आशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश

दोहा : भारताने आपला दुसरा सामना जिंकून आशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दोहा स्टेडियमवर

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.