अभिषेक बच्चनचा अपमान होतो तेव्हा....

मुंबई : फिल्म स्टार्सचे किस्से नेहमीच चवीने चर्चिले जातात. असा एक किस्सा अभिषेक बच्चनने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला. एका कार्यक्रमामध्ये त्याला चुकीची वागणूक देण्यात आल्याचे तसेच त्याला न सांगता चित्रपटातून बाहेरचा रस्ता देखील दाखवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा अभिषेकने या मुलाखतीत केलाय. अभिषेकने या मुलाखतीत म्हटले की, ‘एकदा मला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तेही कोणतीही माहिती न देता. जेव्हा मी चित्रीकरणासाठी पोहोचलो तेव्हा पाहिलं तर दुसऱ्याच अभिनेत्यासोबत सीन शूट करणे सुरु होते. ते पाहून मी तेथून निघून गेलो. त्यानंतर मी अनेकांना फोन केले. त्यांनी कुणीही माझे फोन उचलले नाहीत’ असे अभिषेके म्हणाला.



पुढे तो म्हणाला, ‘मी एका मोठ्या कार्यक्रमाला गेलो होतो. तेव्हा मला पहिल्या रांगेत बसण्यास सांगण्यात आले होते. पण तेथे जेव्हा एक लोकप्रिय अभिनेता आला तेव्हा मला उठवून मागच्या रांगेत बसण्यास सांगण्यात आले. या सर्व गोष्टी तुम्ही पर्सनली घेऊ शकत नाही कारण तो त्या कार्यक्रमाचा एक भागच असतो. हा प्रकार घडल्यानंतर मी घरी आले आणि आता यापुढे आणखी मेहनत घेऊन काम करेन असे ठरवले. मी त्यांच्या पेक्षा मोठा अभिनेता बनेन आणि पहिल्या रांगेत बसण्याचा मान मिळवेन असे ठरवले होते.’


Comments
Add Comment

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे