अभिषेक बच्चनचा अपमान होतो तेव्हा....

  89

मुंबई : फिल्म स्टार्सचे किस्से नेहमीच चवीने चर्चिले जातात. असा एक किस्सा अभिषेक बच्चनने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला. एका कार्यक्रमामध्ये त्याला चुकीची वागणूक देण्यात आल्याचे तसेच त्याला न सांगता चित्रपटातून बाहेरचा रस्ता देखील दाखवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा अभिषेकने या मुलाखतीत केलाय. अभिषेकने या मुलाखतीत म्हटले की, ‘एकदा मला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तेही कोणतीही माहिती न देता. जेव्हा मी चित्रीकरणासाठी पोहोचलो तेव्हा पाहिलं तर दुसऱ्याच अभिनेत्यासोबत सीन शूट करणे सुरु होते. ते पाहून मी तेथून निघून गेलो. त्यानंतर मी अनेकांना फोन केले. त्यांनी कुणीही माझे फोन उचलले नाहीत’ असे अभिषेके म्हणाला.



पुढे तो म्हणाला, ‘मी एका मोठ्या कार्यक्रमाला गेलो होतो. तेव्हा मला पहिल्या रांगेत बसण्यास सांगण्यात आले होते. पण तेथे जेव्हा एक लोकप्रिय अभिनेता आला तेव्हा मला उठवून मागच्या रांगेत बसण्यास सांगण्यात आले. या सर्व गोष्टी तुम्ही पर्सनली घेऊ शकत नाही कारण तो त्या कार्यक्रमाचा एक भागच असतो. हा प्रकार घडल्यानंतर मी घरी आले आणि आता यापुढे आणखी मेहनत घेऊन काम करेन असे ठरवले. मी त्यांच्या पेक्षा मोठा अभिनेता बनेन आणि पहिल्या रांगेत बसण्याचा मान मिळवेन असे ठरवले होते.’


Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.