अभिषेक बच्चनचा अपमान होतो तेव्हा....

मुंबई : फिल्म स्टार्सचे किस्से नेहमीच चवीने चर्चिले जातात. असा एक किस्सा अभिषेक बच्चनने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला. एका कार्यक्रमामध्ये त्याला चुकीची वागणूक देण्यात आल्याचे तसेच त्याला न सांगता चित्रपटातून बाहेरचा रस्ता देखील दाखवण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा अभिषेकने या मुलाखतीत केलाय. अभिषेकने या मुलाखतीत म्हटले की, ‘एकदा मला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तेही कोणतीही माहिती न देता. जेव्हा मी चित्रीकरणासाठी पोहोचलो तेव्हा पाहिलं तर दुसऱ्याच अभिनेत्यासोबत सीन शूट करणे सुरु होते. ते पाहून मी तेथून निघून गेलो. त्यानंतर मी अनेकांना फोन केले. त्यांनी कुणीही माझे फोन उचलले नाहीत’ असे अभिषेके म्हणाला.



पुढे तो म्हणाला, ‘मी एका मोठ्या कार्यक्रमाला गेलो होतो. तेव्हा मला पहिल्या रांगेत बसण्यास सांगण्यात आले होते. पण तेथे जेव्हा एक लोकप्रिय अभिनेता आला तेव्हा मला उठवून मागच्या रांगेत बसण्यास सांगण्यात आले. या सर्व गोष्टी तुम्ही पर्सनली घेऊ शकत नाही कारण तो त्या कार्यक्रमाचा एक भागच असतो. हा प्रकार घडल्यानंतर मी घरी आले आणि आता यापुढे आणखी मेहनत घेऊन काम करेन असे ठरवले. मी त्यांच्या पेक्षा मोठा अभिनेता बनेन आणि पहिल्या रांगेत बसण्याचा मान मिळवेन असे ठरवले होते.’


Comments
Add Comment

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या

बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १८६४ ला भावपूर्ण निरोप

मुंबई  :  मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट उपक्रमातील शेवटची मोठ्या आकाराची JNNURM बसगाडी

अभिनेत्री तेजस्विनी लोणारीचा साखरपुडा संपन्न! राजकारण सक्रीय असलेल्या कुटुंबाची होणार थोरली सून

मुंबई: बिग बॉस मराठी ४ मधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लवकरच बोहल्यावर चढणार आहे.

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५

आजपासून मुंबईत 'इंडिया मेरीटाईम सप्ताह', केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : शंभराहून अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, ५०० प्रदर्शक, २०० पेक्षा अधिक तज्ज्ञ

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी