गणपतीपुळे येथे पर्यटकाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी (प्रतिनिधी) :तालुक्यातील गणपतीपुळे येथे फिरायला आलेल्या मूळ उत्तरप्रदेशमधील ५ पर्यटकांपैकी एकाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. तर चौघांना वाचवण्यात जीव रक्षकांना यश आले असून त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली.



रत्नाकर कल्पनाथ सरोज (२४) असे बुडून मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. तर गोलू समरजित सरोज (२६), रोहित संजिवन वर्मा (२३), कपिल रामशंकर वर्मा (२८), मयुर सुधीर मिश्रा (२८) यांना वाचवण्यात जीवरक्षकांना यश आले आहे. हे सर्वजण गणपतीपुळे येथे फिरण्यासाठी आले होते. रविवारी सायंकाळी समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी ते समुद्रात गेले असता रत्नाकर सरोज याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागला. ही बाब त्यांच्या साथीदारांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून जीव रक्षक अक्षय माने, ओंकार गवाणकर, आशिष माने, अनिकेत राजवाडकर, मयुरेश देवरुखकर यांनी समुद्रात उड्या घेऊन पाचही जणांना पाण्याबाहेर काढले. परंतु, रत्नाकर सरोज याच्या नाका-तोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला.

Comments
Add Comment

सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर; ‘मेस्मा’लागू ; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

मुंबई : महावितरणमधील सात वीज कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने ९ ते ११ ऑक्टोबरपर्यंत संप पुकारला आहे. या

पुणे मेट्रो ‘कॅशलेस’ व्यवहारांमुळे राज्यात अव्वल

पुणे : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला प्राधान्य दिल्याने ‘कॅशलेस’ व्यवहारात

पुण्याला पावसाने झोडपले

पुणे : गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी दुपारी तीनपासून पुन्हा एकदा पुण्याला अक्षरश: झोडपले.

आरोग्य विभाग करणार १७०० रुग्णवाहिकांची खरेदी!

राज्यातील सर्व रुग्णवाहिकांचे होणार एकत्रित नेटवर्क व संचलन मुंबई : आरोग्य विभागाअंतर्गत रुग्णवाहिका सेवा

लातूर जिल्ह्यात भीषण अपघातात वाघोली येथील बहिण-भावाचा जागीच मृत्यू

लातूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रिय महामार्गावर भीषण अपघातात बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला आहे.औसा–निलंगा

पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत विमानतळाचे होणार उद्घाटन; नवी मुंबईत वाहतुकीत बदल

रायगड : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नवी मुंबई