रसाळगड किल्ल्याचा होणार कायापालट

  160

खेड (प्रतिनिधी) :छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा खेड तालुक्यातील रसाळगड किल्ल्याचा लवकरच कायापालट होणार आहे. या किल्ल्यावरील अत्यावश्यक जतन दुरुस्ती कामांसाठी लागणारे १४ कोटी १६ लाख २१ हजार रुपयांचे अंदाजपत्रक पुरातत्त्व विभागाने शासनाला सादर केले असून लवकरच या अंदाजपत्रकाला शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्रशासकीय मंजुरी मिळणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी दिली.



मागील टप्प्यातील रसाळगड किल्ल्यावर अनेक कामे अपूर्ण आहेत. नवीन अंदाजपत्रकात किल्ल्यातील झाडे झुडपे काढणे, तटबंदी, धान्यकोठार, बालेकिल्ला इत्यादी वास्तूंची दुरुस्ती तसेच पर्यटकांकरिता विशेष सोयीसुविधा या प्रमुख बाबींचा समावेश आहे.
रसाळगड किल्ल्यावरील मागील टप्प्यातील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणे व पर्यटकांकरिता आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करणे यासाठी घेरारसाळगड गावचे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे हे मागील अनेक वर्षे शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला यश येत आहे. वरील पुरातत्त्व विभागाने प्रस्तावित केलेली कामे प्रत्यक्षात जेव्हा मार्गी लागतील तेव्हा किल्ले रसाळगडचे पर्यटन दृष्टीने महत्त्व वाढणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत