रसाळगड किल्ल्याचा होणार कायापालट

खेड (प्रतिनिधी) :छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा खेड तालुक्यातील रसाळगड किल्ल्याचा लवकरच कायापालट होणार आहे. या किल्ल्यावरील अत्यावश्यक जतन दुरुस्ती कामांसाठी लागणारे १४ कोटी १६ लाख २१ हजार रुपयांचे अंदाजपत्रक पुरातत्त्व विभागाने शासनाला सादर केले असून लवकरच या अंदाजपत्रकाला शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून प्रशासकीय मंजुरी मिळणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे यांनी दिली.



मागील टप्प्यातील रसाळगड किल्ल्यावर अनेक कामे अपूर्ण आहेत. नवीन अंदाजपत्रकात किल्ल्यातील झाडे झुडपे काढणे, तटबंदी, धान्यकोठार, बालेकिल्ला इत्यादी वास्तूंची दुरुस्ती तसेच पर्यटकांकरिता विशेष सोयीसुविधा या प्रमुख बाबींचा समावेश आहे.
रसाळगड किल्ल्यावरील मागील टप्प्यातील अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करणे व पर्यटकांकरिता आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करणे यासाठी घेरारसाळगड गावचे सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र आखाडे हे मागील अनेक वर्षे शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला यश येत आहे. वरील पुरातत्त्व विभागाने प्रस्तावित केलेली कामे प्रत्यक्षात जेव्हा मार्गी लागतील तेव्हा किल्ले रसाळगडचे पर्यटन दृष्टीने महत्त्व वाढणार आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद