आंबा व्यावसायिक करणार गुरूवारी धरणे आंदोलन

रत्नागिरी (वार्ताहर) : अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामात हापूस उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. शासनाला वारंवार निवेदने देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांकडून गुरूवार २३ डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आंबा बागायतदार बावा साळवी यांनी दिली.शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तुकाराम घवाळी, दीपक राऊत आदी उपस्थित होते.


Mango traders will hold agitation on Thursday
कोकणातील आंबा, काजू, नारळ आदी फळबागायतींमधून शेतकरी व शेतमजूर यांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. अनेकांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे हे एकमेव साधन आहे. गेली १५ वर्षे निसर्गाच्या बदलातून वादळ, वारा व अकाली पाऊस, ढगाळ वातावरण, रासायनिक प्रदूषण यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात आंबा, काजू आदी फळझाडांना चांगले मोहर आले असतानाच अवकाळी पाऊस पडून मोहरावर कीड, करपा, बुरशी व भुरी आदी रोगांची लागण होऊन फळ पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या कष्टाने फळबागांचे संगोपन करून आंबा, काजू व्यवसायिकांनी पीक कर्जे घेतली.


निसर्गाच्या बदलत्या स्थितीमुळे कर्जाची परतफेड होऊ शकलेली नाही. त्यामुळे बँकामार्फत न्यायालयांकडून वसुलीचे मार्ग अवलंबून शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली करण्याबाबतची कार्यवाही केली जात आहे. कर्ज पुनर्घटनेबाबतही शासनाचे दुर्लक्ष होत आहे, असे बावा साळवी म्हणाले.

Comments
Add Comment

Mumbai-Pune ExpressWay : चक्क भाजलेल्या हातांनी रोखला मृत्यू! पेरूच्या खुट्टीनं टळला मोठा अनर्थ; एक छोटी चूक अन् १० किमीचा परिसर झाला असता खाक

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर नुकत्याच झालेल्या महाभीषण वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

Weather Update: महाराष्ट्रातील वातावरणात बदल, कोकण ते विदर्भापर्यंत पुन्हा अलर्ट, ११ फेब्रुवारीला कसं असेल हवामान?

मुंबई: महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हवामानात बदल दिसून येत आहे. हिवाळी थंड आता बऱ्याच प्रमाणात

छत्रपती संभाजीनगरात १२ वीच्या इंग्रजी पेपरदरम्यान मोठा गैरप्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर: जिल्ह्यातील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालय, जैतापूर येथे इयत्ता १२ वीच्या इंग्रजी

Central Railway : मध्य रेल्वे चालवणार २४ विशेष रेल्वे गाड्या; कुठे कुठे धावणार ?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (सीएसएमटी) आणि नागपूर/कोल्हापूर/सावंतवाडी रोड व • लोकमान्य टिळक टर्मिनस

Dombivali news : स्वप्नांचा चक्काचूर! बारावीचा पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला, धावत्या ट्रेनमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

डोंबिवली : बारावीच्या परीक्षेचा पहिलाच दिवस एका कुटुंबासाठी कधीही भरून न येणारे दु:ख घेऊन आला. डोंबिवली येथील

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न साकार; इंदापूरमध्ये नव्या औद्योगिक पर्वाची सुरुवात!

रत्नपुरी मळ्यात साकारणार नवी 'एमआयडीसी' रत्नपुरी माळ्यातील एक हजार एकर जमीन ‘एमआयडीसी’कडे हस्तांतरीत करण्याचा