आंबा व्यावसायिक करणार गुरूवारी धरणे आंदोलन

रत्नागिरी (वार्ताहर) : अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामात हापूस उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. शासनाला वारंवार निवेदने देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांकडून गुरूवार २३ डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आंबा बागायतदार बावा साळवी यांनी दिली.शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तुकाराम घवाळी, दीपक राऊत आदी उपस्थित होते.


Mango traders will hold agitation on Thursday
कोकणातील आंबा, काजू, नारळ आदी फळबागायतींमधून शेतकरी व शेतमजूर यांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. अनेकांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे हे एकमेव साधन आहे. गेली १५ वर्षे निसर्गाच्या बदलातून वादळ, वारा व अकाली पाऊस, ढगाळ वातावरण, रासायनिक प्रदूषण यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात आंबा, काजू आदी फळझाडांना चांगले मोहर आले असतानाच अवकाळी पाऊस पडून मोहरावर कीड, करपा, बुरशी व भुरी आदी रोगांची लागण होऊन फळ पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या कष्टाने फळबागांचे संगोपन करून आंबा, काजू व्यवसायिकांनी पीक कर्जे घेतली.


निसर्गाच्या बदलत्या स्थितीमुळे कर्जाची परतफेड होऊ शकलेली नाही. त्यामुळे बँकामार्फत न्यायालयांकडून वसुलीचे मार्ग अवलंबून शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली करण्याबाबतची कार्यवाही केली जात आहे. कर्ज पुनर्घटनेबाबतही शासनाचे दुर्लक्ष होत आहे, असे बावा साळवी म्हणाले.

Comments
Add Comment

माकडांची मस्ती बेतली तरुणीच्या जीवावर; राजगडावर घडली भयंकर घटना

पुणे : राजगड किल्ला सर करण्यासाठी गेलेल्या मुंबईच्या तरुणीच्या डोक्यात दगड पडल्याने तरुणी जखमी झाली आहे.

वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकांवर आधारित

मुख्यमंत्री फडणवीस यांची काँग्रेसवर टीका छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस फक्त वोट चोरीचे आरोप खोट्या आख्यायिकेवर

छत्रपती संभाजीनगर : फडणवीसांच्या दौर्‍याने राजकीय वातावरण तापलं

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या भाजपच्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शहरात राजकीय हालचालींना

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

सततच्या अपघातांमुळे नवले पूल परिसर ‘मृत्यूचा सापळा’

पाच वर्षांत २५७ अपघात; ११५ जणांचा बळी पुणे  : नवले पूल परिसरातील प्राणांतिक अपघातांची साखळी थांबण्याचे नाव घेत