आंबा व्यावसायिक करणार गुरूवारी धरणे आंदोलन

Share

रत्नागिरी (वार्ताहर) : अवकाळी पावसामुळे यंदाच्या हंगामात हापूस उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. शासनाला वारंवार निवेदने देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कोकणातील शेतकऱ्यांकडून गुरूवार २३ डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आंबा बागायतदार बावा साळवी यांनी दिली.शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तुकाराम घवाळी, दीपक राऊत आदी उपस्थित होते.

Mango traders will hold agitation on Thursday
कोकणातील आंबा, काजू, नारळ आदी फळबागायतींमधून शेतकरी व शेतमजूर यांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. अनेकांच्या कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे हे एकमेव साधन आहे. गेली १५ वर्षे निसर्गाच्या बदलातून वादळ, वारा व अकाली पाऊस, ढगाळ वातावरण, रासायनिक प्रदूषण यामुळे बागायतदार शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात आंबा, काजू आदी फळझाडांना चांगले मोहर आले असतानाच अवकाळी पाऊस पडून मोहरावर कीड, करपा, बुरशी व भुरी आदी रोगांची लागण होऊन फळ पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी स्वत:च्या कष्टाने फळबागांचे संगोपन करून आंबा, काजू व्यवसायिकांनी पीक कर्जे घेतली.

निसर्गाच्या बदलत्या स्थितीमुळे कर्जाची परतफेड होऊ शकलेली नाही. त्यामुळे बँकामार्फत न्यायालयांकडून वसुलीचे मार्ग अवलंबून शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली करण्याबाबतची कार्यवाही केली जात आहे. कर्ज पुनर्घटनेबाबतही शासनाचे दुर्लक्ष होत आहे, असे बावा साळवी म्हणाले.

Recent Posts

पुस्तकांचे पालकत्व

गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…

1 hour ago

बाल गुन्हेगार कसे तयार होतात?

फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…

2 hours ago

कुरुंदकरला जन्मठेप; खाकी वर्दीवर काळा डाग

महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…

2 hours ago

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

4 hours ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

5 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

5 hours ago