मिलिंद गुणाजीचा मुलगा अभिषेक गुणाजी अडकला लग्न बंधनात

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिध्द जोडी  मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजीचा लग्न समारंभ  अगदी पारंपरिकरित्या पार पडलाय. अभिषेक गुणाजी हा नुकताच राधा पाटील हिच्या सोबत लग्न बंधनात अडकला.



या दोघांच्या हळदीचे आणि लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल झाले आहेत. या दोघांना नेटकरांनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या लग्नाचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे लग्न मुंबईतल्या एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेलं नाही. तर मालवण येथील एका मंदिरात अगदी पारंपरिकरित्या पार पडलं.



. याबाबत मिलिंद गुणाजीने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की , आम्ही एक कुटुंब म्हणून आपली संस्कृती आणि वारसा जपला आहे. म्हणून आम्ही वालावल, मालवण येथे खाजगी समारंभ करण्याचे निवडले आहे. महाराष्ट्राच्या नैसर्गिक सौंदर्याचा, अतुलनीय पर्यटनस्थळांचा आणि अजोड गडकिल्ल्यांच्या खजिन्याचा मी नेहमीच प्रचार करत आलोय. महाराष्ट्रात पारंपारिक पद्धतीने लग्नसोहळा व्हावा अशी आमची इच्छा होती. हा महत्वाचा संदेश आपल्या स्वतःच्या जीवनशैलीतून देण्याचा हा आमचा एक प्रयत्न होता. महाराष्ट्रात असलेली पर्यटन स्थळे परदेशातल्या पर्यटनस्थळांच्या तोडीची आहेत.त्यामुळे अशाच सुंदर डेस्टिनेशन वर हा लग्नसोहळा करण्याचे ठरले."

या लग्नसोहळ्यासाठी अभिषेक, मिलिंद आणि राणी गुणाजी एकदी पारंपरिकरित्या सजले होते...



अभिषेकच्या हळदीला राणी गुणाजीने मस्त ताल धरला.



अभिषेकची पत्नी राधा ही फार्मा इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहे.

Comments
Add Comment

Maria Juliana : प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री थलपती विजयवर गंभीर आरोप ; "माझ्या मिसकॅरेजसाठी..."

प्रसिद्ध तमिळ अभिनेत्रीचा मुख्यमंत्री जोसेफ विजयवर गंभीर आरोप ; तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री जोसेफ विजय

Deool Band 2 : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' ची गगणभरारी ; ११ दिवसात केली 'इतक्या' कोटींची कमाई !

बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाचा डंका पाहायला मिळत आहे. चित्रपटाने वीकेंडला बंपर कमाई केली.

Me Savitribai Jotirao Phule : 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितले बंद होण्यामागचे कारण

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Pooja Bhatt : पूजा भटनं सांगितलं घटस्फोटाचं खरं कारण, म्हणाली.......

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट करिअरपेक्षा तिच्या पर्सनल आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली आहे. अनेक

Sobhita Dhulipala : नागा चैतन्यासोबतच्या नात्यावर होणाऱ्या ट्रॉलिंगवर पहिल्यांदाच बोलली सोभिता धूलिपाला ; म्हणाली..

सोभिता धूलिपाला व नागा चैतन्या यांचे नाते नेहमी चर्चेत राहिले आहे. समांथा रुथ प्रभूपासून विभक्त झाल्यानंतर नागा

Karishma Kapoor : ‘मेंटलहुड’ नंतर करिश्मा कपूर पुन्हा एकदा थरारक क्राइम सिरीजमध्ये ; ट्रेलर बघून चर्चेला उधाण!

मुंबई : 'मर्डर मुबारक' नंतर दोन वर्षांनी करिश्मा कपूर पुन्हा एका दमदार भूमिकेत परतली आहे.‘मेंटलहुड’ नंतरचा हा