२० ते २४ डिसेंबरदरम्यान ऑनलाईन रोजगार मेळावा

  98

वर्धा (हिं.स.) : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वर्धा यांचे मार्फत २० ते २४ डिसेंबर या कालावधीत सकाळी ११ वाजता जिल्हास्तरीय पंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.


रोजगार मेळाव्यामध्ये एसएसएम फार्मुलेशन प्रा.लि.कंपनी वणी, गिमाटेक्स टेक्सटाईल्स इंडस्ट्रिज हिंगणघाट व वणी, एमडिएसएचजी मार्केटिंग कंपनी, नवकिसान बायो प्लाँट नागपूर, युरेका फोरबेस नागपूर, डिमार्ट, ध्रुत ट्रास्मिशन, ईत्यादी कंपन्या सहभागी होणार असून सदर कंपन्यामध्ये रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहे. त्यामुळे इच्छुक पात्र पुरुष व महिला उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात ऑनलाईन सहभाग नोंदवावा. मुलाखती व निवड प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे.


ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभाग घेण्याकरीता एसएससी पास, नापास, पदवी, पदवीका आयटीआय, डिप्लोमा, डिग्री धारण केलेल्या उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावार ऑनलाईन नोंदणी करून सहभागी व्हावे, याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या दुरध्वनी क्र. 07152-242756 अथवा wardharojgar@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी केले आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या