नियमीत प्रवाशांच्या तिकिटामध्ये होणार बचत

  35

मुंबई : बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर आणण्यासाठी आणि बेस्टचे प्रवासी वाढविण्यासाठी बेस्ट विविध योजना राबवत असते. आता देखील बेस्ट उपक्रमाने बस पास आणि दैनंदिन तिकिटामध्ये बचत करणारी योजना आणली आहे. त्यानुसार ७२ प्रकारच्या विविध नव्या योजनांमधून प्रवासी आपल्याला हवी असलेली योजना निवडणार आहेत.



लोकलनंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणजे बेस्टकडे पाहिले जाते. बेस्ट उपक्रमाच्या बसमधून दिवसाला २७ ते ३० लाख प्रवासी प्रवास करतात. कामानिमित्त दिवसातून बऱ्याचदा अनेकांना बेस्टने प्रवास करावा लागतो. अशा प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रम आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एकात्मिक तिकीट प्रणाली) आणि मोबाईल अॅप सुविधा आणणार आहे. हे कार्ड घेतानाच प्रवाशांना एक मोबाईल अॅप डाऊनलोड करून कार्डला मोबाईल अॅपची जोड दिली जाईल. त्याद्वारेच या योजनेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. विना वातानुकूलित आणि वातानुकूलित बस प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे. या योजनेनुसार दोन आठवडे, चार आठवडे आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फेऱ्या, दिवस यावर आधारित निवडक भाडे टप्प्यात प्रवास करता येणार आहे.



यापूर्वी देखील बेस्टच्या मॅजिक पास म्हणजे ४० रुपयांच्या तिकिटावर दिवसभर प्रवास करण्याची मुभा दिली होती. मात्र आता या नवीन योजनेचा प्रवाशांना अधिक फायदा होणार आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.