नियमीत प्रवाशांच्या तिकिटामध्ये होणार बचत

  36

मुंबई : बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर आणण्यासाठी आणि बेस्टचे प्रवासी वाढविण्यासाठी बेस्ट विविध योजना राबवत असते. आता देखील बेस्ट उपक्रमाने बस पास आणि दैनंदिन तिकिटामध्ये बचत करणारी योजना आणली आहे. त्यानुसार ७२ प्रकारच्या विविध नव्या योजनांमधून प्रवासी आपल्याला हवी असलेली योजना निवडणार आहेत.



लोकलनंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणजे बेस्टकडे पाहिले जाते. बेस्ट उपक्रमाच्या बसमधून दिवसाला २७ ते ३० लाख प्रवासी प्रवास करतात. कामानिमित्त दिवसातून बऱ्याचदा अनेकांना बेस्टने प्रवास करावा लागतो. अशा प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रम आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एकात्मिक तिकीट प्रणाली) आणि मोबाईल अॅप सुविधा आणणार आहे. हे कार्ड घेतानाच प्रवाशांना एक मोबाईल अॅप डाऊनलोड करून कार्डला मोबाईल अॅपची जोड दिली जाईल. त्याद्वारेच या योजनेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. विना वातानुकूलित आणि वातानुकूलित बस प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे. या योजनेनुसार दोन आठवडे, चार आठवडे आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फेऱ्या, दिवस यावर आधारित निवडक भाडे टप्प्यात प्रवास करता येणार आहे.



यापूर्वी देखील बेस्टच्या मॅजिक पास म्हणजे ४० रुपयांच्या तिकिटावर दिवसभर प्रवास करण्याची मुभा दिली होती. मात्र आता या नवीन योजनेचा प्रवाशांना अधिक फायदा होणार आहे.

Comments
Add Comment

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड

महा मुंबई मेट्रोचा ऐतिहासिक विक्रम; ३९ महिन्यांत ओलांडला २० कोटी प्रवाशांचा टप्पा!

मुंबई : मुंबईच्या मेट्रोने आज खराखुरा इतिहास रचला आहे. अवघ्या ३९ महिन्यांत तब्बल २० कोटी प्रवाशांचा टप्पा पार करत