नियमीत प्रवाशांच्या तिकिटामध्ये होणार बचत

मुंबई : बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर आणण्यासाठी आणि बेस्टचे प्रवासी वाढविण्यासाठी बेस्ट विविध योजना राबवत असते. आता देखील बेस्ट उपक्रमाने बस पास आणि दैनंदिन तिकिटामध्ये बचत करणारी योजना आणली आहे. त्यानुसार ७२ प्रकारच्या विविध नव्या योजनांमधून प्रवासी आपल्याला हवी असलेली योजना निवडणार आहेत.



लोकलनंतर मुंबईची दुसरी जीवनवाहिनी म्हणजे बेस्टकडे पाहिले जाते. बेस्ट उपक्रमाच्या बसमधून दिवसाला २७ ते ३० लाख प्रवासी प्रवास करतात. कामानिमित्त दिवसातून बऱ्याचदा अनेकांना बेस्टने प्रवास करावा लागतो. अशा प्रवाशांसाठी बेस्ट उपक्रम आता नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (एकात्मिक तिकीट प्रणाली) आणि मोबाईल अॅप सुविधा आणणार आहे. हे कार्ड घेतानाच प्रवाशांना एक मोबाईल अॅप डाऊनलोड करून कार्डला मोबाईल अॅपची जोड दिली जाईल. त्याद्वारेच या योजनेचा लाभ प्रवाशांना घेता येणार आहे. विना वातानुकूलित आणि वातानुकूलित बस प्रवाशांना ही सुविधा मिळणार आहे. या योजनेनुसार दोन आठवडे, चार आठवडे आणि दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फेऱ्या, दिवस यावर आधारित निवडक भाडे टप्प्यात प्रवास करता येणार आहे.



यापूर्वी देखील बेस्टच्या मॅजिक पास म्हणजे ४० रुपयांच्या तिकिटावर दिवसभर प्रवास करण्याची मुभा दिली होती. मात्र आता या नवीन योजनेचा प्रवाशांना अधिक फायदा होणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल